शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

गणेशोत्सव देखील 100 टक्के पर्यावरण पूरक साजरा करण्याची आवश्यकता- प्रताप सरनाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 18:03 IST

कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे.

मीरारोड: शास्त्रात व शासनाने देखील पाण्यात विरघळणाऱ्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन केलेले असूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवून रासायनिक रंग वापरले जात असल्याने यंदा पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे . त्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र दिले आहे . 

कोरोनामुळे माणसांवर बंधने आली असून संकटकाळ आहे. परंतु एरवी आपली जिवन शैलीमुळे व विविध पद्धतीने होणाऱ्या प्रदूषणामुळे दुरावत चालला निसर्ग व त्यातील प्राणी, पक्षी पुन्हा एकदा उभारी घेतलेले पाहायला मिळतायत. हवेतील व पाण्यातील प्रदूषण कोरोनामुळे थांबले असून पृथ्वी व मानवजातीसाठी या नक्कीच सकारात्मक बाजू आहेत.

कोकणात अगोदरपासून शाडू च्या मातीच्या सुंदर सुबक मुरत्या घडवल्या जातात, पुण्यातही बहुतांश तीच परंपरा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक किंवा इतर परिसरात आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवण्यावर भर देत असल्याने पीओपी आणि रासायनिक रंगा मुळे तलाव , नदी , खाडी व समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन निसर्गाची मोठी हानी होत आहे . 

निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांवर आहे . आता सरकारच्या माध्यमातून प्रदूषण विरहित गणेशोत्सव आदी सण साजरे करायची आवश्यकता आहे .  या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पीओपी वापर बंद करून शाडू मातीच्या मुर्त्याच बनवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी पर्यावरण मंत्री यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे .  कागदाच्या लगद्यापासून मोठ्या मुर्त्या आणि शाडूच्या मातीपासून छोट्या मुर्त्या बनवण्याचा निर्णय घेणे जरुरीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे . 

ज्या मूर्तिकारांनी अगोदरच पीओपी पासून मुर्त्या बनवल्या आहेत त्या राज्य सरकारने स्वतःकडे घेऊन त्याचा जो मोबदला आहे तो मूर्तिकारांना द्यावा, जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही. शाडू मातीच्या मुर्त्या वापरण्यास प्रोत्साहन देण्याचे आदेश पूर्वीच शासनाने न्यायालयाच्या आदेश नंतर जरी केले होते . पण त्याची काटेकोर अमलबजावणी केली गेली नाही अशी आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे .

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवMira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईकAditya Thackreyआदित्य ठाकरे