शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाढीव लोकल फे-यांच्या श्रेयासाठी शिवसेना-भाजप-मनसेचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 17:41 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

डोंबिवली: मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पण हे तर मध्य रेलवेच्या महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी याआधीच जाहिर केले होते, त्यात खासदार शिंदेंचे योगदान काय? असा सवाल करत हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संताप मोर्चाचे फलीत असल्याचा दावा मनसेने केला आहे. तर भाजपने ‘लोकमत’मधील १६ सप्टेंबरच्या वृत्ताचा दाखला देत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतून जादा लोकल सोडा ही मागणी जीएमकडे केली असल्याने फे-या मिळाल्या असे होर्डिंग्ज शहरभर लावले. त्यामुळे वाढीव फे-यांवरुन रंगलेल्या श्रेयवादाच्या राजकारणाची चर्चा रंगली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह शहारध्यक्ष मनोज घरत म्हणाले की, खासदार शिंदे हे केवळ प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. मध्य रेल्वेने २८ सप्टेंबर दस-याच्या निमित्ताने जाहिर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात १ नोव्हेंबर पासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणेपुढील प्रवाशांना दिलासा मिळणार असे स्पष्ट नमूद केले होते. मात्र तरीही शिंदेंनी केलेला प्रयत्न हा केविलवाणा होता. शिंदेंसोबत जाणा-या प्रवासी संघटनेच्या पदाधिका-यांवरही कदम यांनी नाराजी व्यक्त केली. आता संघटनाही प्रसिद्धीच्या मागे लागल्या का? असा टोला त्यांनी लगावला.घरत म्हणाले की, संताप मोर्चाच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या आवाहनानूसार गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरात फेरिवाले बसत नाहीत हे सकारात्मक चित्र आहे. तसेच त्या मोर्चाच्यावेळी रेल्वे अधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत देखिल ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्या उपनगरिय प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी यांनी मांडल्या होत्या हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे सर्व यश हे संताप मोर्चाचे असून ते लाटण्याचा प्रयत्न करु नये असे कदम म्हणाले.चौकट: खासदार शिंदेंनी अंबरनाथ स्थानकाचा कायापालट होणार, हे होणार ते होणार असे सांगितले. पण ते कधी होणार, त्याचे डेटलाइन काय? ते प्रकल्प वेळेतच पूर्ण होणार का? असे सवाल मनसेने उपस्थित केले. की गेल्या तीन वर्षांप्रमाणेच या घोषणाच आहेत का? जे आहे ते सांगा की असे कदम म्हणाले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलthaneठाणे