शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीज कर्मचा-यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या जिल्हापरिषद सदस्य , सरपंचाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:22 IST

भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक ...

ठळक मुद्दे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात काम सुरू केल्याने तीन भावांसह १५-२० जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांच्या भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टाने अर्ज फेटाळल्याने त्यांना हायकोर्टाने भिवंडी कोर्टात हजर रहाण्यास सांगीतले.भिवंडी कोर्टाने तीन भावांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत

भिवंडी : शहरालगत असलेल्या कारीवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून वीज दुरूस्तीसाठी गेलेल्या वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-या जिल्हा परिषद सदस्य व सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने तिघांना आज भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.या घटनेमुळे परिसरांत खळबळ माजली आहे.मागील महिन्यात कारीवली गावांत अचानक वीज जाणे,वीज पुरवठ्यात बिघाड होणे व अनाधिकृत वीज केबलचे जाळे वाढणे अशा वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्यामुळे वीज पुरवठा करणा-या टोरेंन्ट वीज कंपनीच्या दुरूस्ती पथकाने कारीवली गावात जाऊन दुरूस्तीची कामे सुरू केली. त्यावेळी गावातील एका जमावाने कर्मचा-यांना शिवीगाळी करीत मारहाण करीत होती. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिका-यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,सरपंच देवराज नाईक व त्यांचा भाऊ निलम नाईक यांच्यासह अनेकांच्या नांवे नोंद केली होती. या गुन्ह्यातील काही जणांना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले होते.परंतू शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक,कारीवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांचा भाऊ निलम नाईक यांनी अटकपुर्व जामिनासाठी ठाणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. सेशन कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी काल गुरूवार रोजी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.त्यावेळी हायकोर्टाने तीन भावांना भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर रहाण्यास सांगीतले. त्यानुसार तिघे नाईक बंधू आज शुक्रवार रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात हजर झाले.पोलीसांनी त्यांना अटक करून कोर्टात हजर केले असता भिवंडी कोर्टाने त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. या घटनेने तालुक्यात वीज ग्राहकांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा