शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:57 IST

जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. भाजपाने श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मिळवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. याचा फटका ग्रामीण मतदारसंघाला बसणार आहेच पण पूर्व मतदारसंघालाही बसणार असल्याने आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवेसेनेची खºया अर्थाने परीक्षा आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत श्रमजीवी संघटना असल्याने सेनेचे शांताराम मोरे आमदार म्हणून विजयी झाले. हा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून खासदार कपिल पाटील यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांची भेट घेत चर्चा केली. पुढील होणाºया निवडणुका श्रमजीवीने भाजपासोबत लढवाव्यात यासाठी आग्रह धरला. यासाठी पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या भेटी घडवून आणल्या. अखेर आदिवासींच्या समस्या भाजपाच सोडवू शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पंडित यांना देण्यात पाटील यांची सरशी झाली. संघटनेच्या पाठिंब्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जि. प.चा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिंवडी तालुका ठरवणार आहे. भिवंडी महापालिकेत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावल्याने जि. प. निवडणुकीत काँग्रेस सेनेसोबत राहील असे संकेत होते. मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. यामुळे सेनेला आणखी एक धक्का बसला आहे. तर सेनेने सत्तेची गणिते जुळवण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत हातमिळवणी करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपाने श्रमजीवी संघटनेला जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीच्या चार जागा दिल्या आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला जि.प.च्या दोन व दोन पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आघाडीमधून काडीमोड घेणाºया मनसेने मात्र पडघा जि.प. गटात सेनेशी युती करून एक पंचायत समितीचा गण पदरात पाडत पाठिंबा दिला आहे. तर या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या पदाधिकाºयांना उमेदवारी नाकारून नव्या भाजपावाल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. त्याचा फटका भाजपा उमेदवारांना बसू शकले अशी अटकळ बांधली जात आहे.श्रमजीवीने काडीमोड घेतल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख देवानंद थळे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, तालुका संर्पकप्रमुख कुंदन पाटील, कृष्णकांत कोंडलेकर, पंडित पाटील, प्रभूदास नाईक, राजू चौधरी, प्रवीण पाटील, विष्णू चंदे, नीलेश गंधे, किरण चन्ने, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, गणेश गुळवी हे कामाला लागले आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, देवेश पाटील, श्रीकांत गायकर, नारायण पाटील, दयानंद पाटील, संघटनेचे बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, अशोक सापटे, प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी हे रिंगणात आहेत.श्रमजीवी संघटना सोबत असती तर निवडणुकीत चित्र बदलायला नक्कीच मदत झाली असती. या संबंधी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवसैनिक कामाला लागले असून विजय एकाधिरशहाशीचा होतो की सत्याचा हे मतदार ठरवतील.- प्रकाश पाटील,ग्रामीण जिल्हापमुख, शिवसेनाश्रमजीवी संघटना आदिवासी व गरीबांच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत आहे. कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे संघटनेने एकमताने ठरवले आहे.- विवेक पंडित,संस्थापक, श्रमजीवी संघटना.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना