शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:57 IST

जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. भाजपाने श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मिळवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. याचा फटका ग्रामीण मतदारसंघाला बसणार आहेच पण पूर्व मतदारसंघालाही बसणार असल्याने आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवेसेनेची खºया अर्थाने परीक्षा आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत श्रमजीवी संघटना असल्याने सेनेचे शांताराम मोरे आमदार म्हणून विजयी झाले. हा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून खासदार कपिल पाटील यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांची भेट घेत चर्चा केली. पुढील होणाºया निवडणुका श्रमजीवीने भाजपासोबत लढवाव्यात यासाठी आग्रह धरला. यासाठी पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या भेटी घडवून आणल्या. अखेर आदिवासींच्या समस्या भाजपाच सोडवू शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पंडित यांना देण्यात पाटील यांची सरशी झाली. संघटनेच्या पाठिंब्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जि. प.चा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिंवडी तालुका ठरवणार आहे. भिवंडी महापालिकेत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावल्याने जि. प. निवडणुकीत काँग्रेस सेनेसोबत राहील असे संकेत होते. मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. यामुळे सेनेला आणखी एक धक्का बसला आहे. तर सेनेने सत्तेची गणिते जुळवण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत हातमिळवणी करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपाने श्रमजीवी संघटनेला जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीच्या चार जागा दिल्या आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला जि.प.च्या दोन व दोन पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आघाडीमधून काडीमोड घेणाºया मनसेने मात्र पडघा जि.प. गटात सेनेशी युती करून एक पंचायत समितीचा गण पदरात पाडत पाठिंबा दिला आहे. तर या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या पदाधिकाºयांना उमेदवारी नाकारून नव्या भाजपावाल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. त्याचा फटका भाजपा उमेदवारांना बसू शकले अशी अटकळ बांधली जात आहे.श्रमजीवीने काडीमोड घेतल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख देवानंद थळे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, तालुका संर्पकप्रमुख कुंदन पाटील, कृष्णकांत कोंडलेकर, पंडित पाटील, प्रभूदास नाईक, राजू चौधरी, प्रवीण पाटील, विष्णू चंदे, नीलेश गंधे, किरण चन्ने, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, गणेश गुळवी हे कामाला लागले आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, देवेश पाटील, श्रीकांत गायकर, नारायण पाटील, दयानंद पाटील, संघटनेचे बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, अशोक सापटे, प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी हे रिंगणात आहेत.श्रमजीवी संघटना सोबत असती तर निवडणुकीत चित्र बदलायला नक्कीच मदत झाली असती. या संबंधी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवसैनिक कामाला लागले असून विजय एकाधिरशहाशीचा होतो की सत्याचा हे मतदार ठरवतील.- प्रकाश पाटील,ग्रामीण जिल्हापमुख, शिवसेनाश्रमजीवी संघटना आदिवासी व गरीबांच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत आहे. कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे संघटनेने एकमताने ठरवले आहे.- विवेक पंडित,संस्थापक, श्रमजीवी संघटना.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना