शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:57 IST

जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. भाजपाने श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मिळवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. याचा फटका ग्रामीण मतदारसंघाला बसणार आहेच पण पूर्व मतदारसंघालाही बसणार असल्याने आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवेसेनेची खºया अर्थाने परीक्षा आहे.मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत श्रमजीवी संघटना असल्याने सेनेचे शांताराम मोरे आमदार म्हणून विजयी झाले. हा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून खासदार कपिल पाटील यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांची भेट घेत चर्चा केली. पुढील होणाºया निवडणुका श्रमजीवीने भाजपासोबत लढवाव्यात यासाठी आग्रह धरला. यासाठी पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या भेटी घडवून आणल्या. अखेर आदिवासींच्या समस्या भाजपाच सोडवू शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पंडित यांना देण्यात पाटील यांची सरशी झाली. संघटनेच्या पाठिंब्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जि. प.चा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिंवडी तालुका ठरवणार आहे. भिवंडी महापालिकेत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावल्याने जि. प. निवडणुकीत काँग्रेस सेनेसोबत राहील असे संकेत होते. मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. यामुळे सेनेला आणखी एक धक्का बसला आहे. तर सेनेने सत्तेची गणिते जुळवण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत हातमिळवणी करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.भाजपाने श्रमजीवी संघटनेला जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीच्या चार जागा दिल्या आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला जि.प.च्या दोन व दोन पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आघाडीमधून काडीमोड घेणाºया मनसेने मात्र पडघा जि.प. गटात सेनेशी युती करून एक पंचायत समितीचा गण पदरात पाडत पाठिंबा दिला आहे. तर या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या पदाधिकाºयांना उमेदवारी नाकारून नव्या भाजपावाल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. त्याचा फटका भाजपा उमेदवारांना बसू शकले अशी अटकळ बांधली जात आहे.श्रमजीवीने काडीमोड घेतल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख देवानंद थळे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, तालुका संर्पकप्रमुख कुंदन पाटील, कृष्णकांत कोंडलेकर, पंडित पाटील, प्रभूदास नाईक, राजू चौधरी, प्रवीण पाटील, विष्णू चंदे, नीलेश गंधे, किरण चन्ने, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, गणेश गुळवी हे कामाला लागले आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, देवेश पाटील, श्रीकांत गायकर, नारायण पाटील, दयानंद पाटील, संघटनेचे बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, अशोक सापटे, प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी हे रिंगणात आहेत.श्रमजीवी संघटना सोबत असती तर निवडणुकीत चित्र बदलायला नक्कीच मदत झाली असती. या संबंधी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवसैनिक कामाला लागले असून विजय एकाधिरशहाशीचा होतो की सत्याचा हे मतदार ठरवतील.- प्रकाश पाटील,ग्रामीण जिल्हापमुख, शिवसेनाश्रमजीवी संघटना आदिवासी व गरीबांच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत आहे. कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे संघटनेने एकमताने ठरवले आहे.- विवेक पंडित,संस्थापक, श्रमजीवी संघटना.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना