शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ठाणे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच संपले; अध्यक्ष पदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 17:07 IST

Thane Politics: शुक्रवारी २८ मे रोजी, आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे.  ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे बहुमत आहे. पण या सत्तेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपालाही या सत्तेत सहभागी करुन घेतल्याने येथे एकही विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवड आज पार पडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या उमेदवार पुष्पा बोऱ्हाडे पाटील, यांचाच एकमेव उमेदवारी‌ अर्ज दाखल झाला. त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे त्यांचा बिनविरोध  विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. (Pushpa borhade patil  won Election of Thane Zilla Parishad presidence)

        येथील नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पाडली. यानिवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिठासन अधिकारी तथा ठाणे उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे, यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील, बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत केले. या आधी लोकमतने 'ठाणे जि.प.अध्यक्ष पदी पुष्पा बोऱ्हाडे पाटील' या आशयाचे वृत्त २३ मे रोजी प्रसिद्ध करुन या विजयाची जाणीव करून दिली होती.‌ शिवसेनेची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष सुषमा लोणे,यांनी राजिनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

  शुक्रवारी २८ मे रोजी, आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे.  ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे बहुमत आहे. पण या सत्तेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपालाही या सत्तेत सहभागी करुन घेतल्याने येथे एकही विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील, यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल देताच त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, ठाणे जि.प.चे उपाध्यक्ष सुभाष पवार आदींनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे

          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव आहे. त्यास अनुसरून बोऱ्हाडे, यांची या पदी शिवसेनेने निवड केली आहे. या आधी गेल्या साडेतीन वर्षांत शहापूर, भिवंडी आणि कल्याणला अध्यक्ष पदाचा लाभ मिळालेला आहे. मुरबाडला सुभाष पवार यांच्या रूपाने सध्या उपाध्यक्ष पद आहे. या चार तालुक्यांना न्याय दिल्यानंतर अंबरनाथ तालुक्याला संधी देऊन बोऱ्हाडे,यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अंबरनाथच्या चरगांव गटाचे नेतृत्व बोऱ्हाडे करतात. त्यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ अजून दीड वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना