शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये शिवसेनेचा घंटानाद; ...म्हणून १९८६ पासून सुरू आहे हे आदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 12:32 IST

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले.

कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लीम समाजाची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजामध्ये वाद होऊ नये म्हणून याठिकाणी ईद निमित्त नमाज पठण होत असताना आरती व घंटानाद करण्याकरीता हिंदूंना प्रवेश बंदी केली जाते. याचा निषेध म्हणून १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते. दरम्यान राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेत पडलेले दोन गट पाहता यंदाच्या आंदोलनाबाबत उत्सुकता होती. परंतू सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात घोषणाबाजी आणि आरती करत घंटानादा आंदोलन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुर्गाडी किल्ल्यावर ईद नमाज पठनाच्या वेळी घातलेली बंदी झुगारण्यासाठी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आणि नेते आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन १९८६ ला सुरू झाले. ते आजतागायत दरवर्षी सुरू आहे. आज सकाळीच शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेकडील टिळक चौक शहर शाखेतून दुर्गाडी किल्ल्याच्या दिशेने कूच केला होता. लालचौकी याठिकाणी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता यावेळी आरती देखील करण्यात आली. आरती नंतर पोलिसांनी आंदोलक  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 

मग त्यांच हिंदूत्व खोट आहे का! -आनंद दिघे यांनी सुरू केलेले हे आंदोलन तीस वर्षांपासून सुरू आहे, घटनेने हिंदूंना दिलेला दर्शनाचा अधिकार हिरावला जातोय, यावर्षी आम्हाला अपेक्षा होती. कधीकाळी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे, पक्षप्रमुखांना खाली उतरवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्यांनी हा अन्याय  दूर करायला पाहिजे होता, जर खरे हिंदुत्व असते तर मंदिर उघडायला पाहिजे होते, त्यांचे हिंदुत्व खोटे आहे का? हा प्रश्न आज पडलाय. हे सरकार जर हिंदुत्ववादी आहे, तर हा अन्याय दूर करायला पाहिजे होता, असा टोला एकनाथ शिंदे यांना नाव न घेता महानगरप्रमुख विजय साळवी यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBakri Eidबकरी ईदthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे