शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

ठाण्यातून भाजपचे नाव पुसण्याचा शिवसेनेचा प्रयत्न; आमदार केळकरांचा आरोप

By अजित मांडके | Updated: March 13, 2024 17:32 IST

राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगले सुरु असतांना ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण आहे

ठाणेठाणे आणि कल्याण लोकसभेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असतांना आता शिवसेनेकडून वारंवार डावलले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. मुह मे मोदी का नाम और थाना मै बीजेपी बेनाम अशी गत शिवसेनेची असल्याची टिकाही त्यांनी केली आहे. टिएमटीकडून महिला आणि जेष्ठांना सवलतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपला डावलण्यात आल्यानंतर केळकर यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा समाचार घेतला. 

राज्यात जरी शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगले सुरु असतांना ठाण्यात मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण हे आजही सुरुच असल्याचे चित्र आहे. एकीकडे ठाणे लोकसभा ताब्यात घेण्यावर शिवसेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यात आता केळकर यांनी केलेल्या आरोपामुळे यात आणखी भर पडल्याचेच चित्र आहे. बुधवारी ठाण्यात टीएमटी बसच्या कार्यक्रमाला भाजपच्या मंडळींना डावलण्यात आल्याने केळकर संतप्त झाले आहेत. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असतांना शिवसेनेची ही आताची वेळ नसून ते वारंवार भाजपला डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुळात जेष्ठ नागरीकांना मोफत प्रवास आणि महिलांना सवलत ही भाजपचीच मागणी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपला हे नवीन नाही, यापूर्वी देखील अखंड शिवसेने सोबत २५ वर्षे आम्ही  ठाणे महापालिकेत होतो, आता देखील विभक्त झाल्यानंतर एका शिवसेनेसोबत आहोत, परंतु शिवसेनेच्या एकतर्फी निर्णयाची, धोरणाची भाजपला सवय झाली असल्याचेही ते म्हणाले. मला या विषयावर बोलायचे नव्हते. परंतु सहन शक्तीला देखील मर्यादा असते, भाजपचा कार्यकर्ता हा स्वाभीमानी कार्यकर्ता आहे. परंतु वारंवार डावलण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यात भाजपचे नाव यांना ठाण्यात कुठेही नकोय म्हणून अशा पध्दतीने डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी देखील शिवशाही चषक, नमो महारोजगार मेळावा यांच्या जागा का बदलण्यात आल्या. असा सवालही त्यांनी केला आहे.

आता जाणता राजा प्रयोगाच्या जागाही शिवसेनेची नेते मंडळी करीत आहेत. सर्व कार्यक्रम हे कोपरी पाचपाखाडी भागातच खेचले जात असून ते चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. यात नोकरशाही हतबल असून महापालिका, जिल्हाधिकारी हे देखील हतबल असल्याचे ते म्हणाले. परंतु युतीचा धर्म पाळायचा असे केवळ बोलायचे मात्र प्रत्यक्षात दुसरेच कारयचे निवडणुकीच्या तोंडावर अशा पध्दतीने डावलने अयोग्य असल्याचेही ते म्हणाले. भाजपला अपमानीत करणे चालणार नाही, याचे परिणाम मग भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला.

त्यांचा हा गैरसमज होतो, आजचा कार्यक्रम हा शिवसेना पक्षाकडून आयोजित केला होता. पक्षाने आनंद व्यक्त केला, तेथे लावण्यात आलेला बॅनरवर देखील त्यांच्या नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांचा गैरसमज दूर केला आहे. शिवशाही चषकासाठी १० वर्षे अर्ज करीत होतो, त्यानंतर तो ठाण्यात घेण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत नाही, त्या बाबतचाही गैरसमज दूर करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा