शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भाजपाची खिचडी शिवसेना करणार साफ

By admin | Updated: January 26, 2017 03:14 IST

मराठी शाळांबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळांतील खिचडी साफ करण्याची वेळ आल्याचे सांगत दीर्घकाळ भाजपाच्या हाती

ठाणे : मराठी शाळांबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आश्रमशाळांतील खिचडी साफ करण्याची वेळ आल्याचे सांगत दीर्घकाळ भाजपाच्या हाती असलेला कोकण शिक्षक मतदारसंघ घेण्यास शिवसेना सज्ज झाल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच आपला उमेदवार उभा केला असून ज्ञानेश्वर म्हात्रे हे पक्षातर्फे रिंगणात आहेत. त्यांच्या वचननाम्याचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांवर केवळ शिकवण्याची जबाबदारी असायला हवी, असे सांगत अन्य कामांना असलेल्या विरोधाचा शिक्षकांचा कळीचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. यासाठी आम्ही लढा देऊ आणि त्यात यश मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. हे चिंताजनक आहे. त्यासाठी ई क्लास, व्हर्च्युअल क्लास रुम, डिजिटल क्लास असे विविध उपक्रम राबवत तेथील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या जागतिक प्रवाहात आणण्यासाठी सरकार काम करत असल्याचे शिंदे यांनी निदर्शनास आणले. रायगडमधील शेकापच्या उमेदवाराचा आम्हाला फटका बसणार नाही. आम्ही या निवडणुकीत शिक्षक नाही, तर मुख्याध्यापकाला उभे केल्याचे सांगत त्यांनी आमच्या उमेदवाराचा दर्जा वरचा असल्याचा टोला लगावला. शिक्षक हा गुणवत्तापूर्ण समाजाचा आधारस्तंभ आहे. सुसंस्कृत समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या शिरावर असते. त्यामुळेच विद्यादानाचे कार्य आपल्या संस्कृतीत सर्वात महान मानले गेले आहे. पण त्या कामासाठीच शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांच्या अनेक समस्या असून सरकार त्या दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत आहे. नव्या पिढीला घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळेच त्यांच्या समस्या तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. शिक्षकांपुढे समायोजनाची टांगती तलवार आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. परंतु, शिक्षक भरतीवर बंदी आहे. (प्रतिनिधी)