शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

शिवसेनेला धक्का, खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:23 IST

शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. सरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हनुमान ठोंबरे सात मते मिळाली.

डोंबिवली : शिवसेनेची २० वर्षांपासून सत्ता असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. सरपंचपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हनुमान ठोंबरे सात मते मिळाली. तर शिवसेनेचे पारडे जड असतानाही त्यांचे उमेदवार योगेश ठाकरे यांना अवघी दोन मते मिळवता आली.११ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे सहा तर भाजपाचे पाच सदस्य होते. त्यात यंदाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन महिला सदस्यांचे अपहरण तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपाचे केडीएमसीचे नगरसेवक महेश पाटील यांना अटक व सुटका झाली होती. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि रंगतदार बनली होती. संख्याबळाच्या तुलनेत शिवसेनेचे पारडे जड असले, तरी शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले, तर दोघांनी थेट भाजपालाच मतदान केले. त्यामुळे भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.ठोंबरे मोठ्या मतांनी विजयी झाले असले तरी पक्षभेद विसरून एकत्र काम करणार असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले. विजयाचे श्रेय सदस्य, कार्यकर्ते आणि नगरसेवक पाटील यांना जाते असेही ठोंबरे म्हणाले. या वेळी नगरसेवक पाटील, डॉ. सुनीता पाटील, खुशबू चौधरी, साई शेलार ,उपमहापौर मोरेश्वर भोईर, कल्याण सरचिटणीस शिवाजी आव्हाड, सुजित नलावडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना