शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

गणेश नाईकांमुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात वाढता धोका; नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ सोडण्यास विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:35 IST

रविवारी वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यास शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे व विरोधात काम करण्याचे मत व्यक्त केले

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. भविष्यात शिवसेनेला जिल्ह्यात धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे आताच योग्य पावले उचलण्यात यावीत व नवी मुंबईमधील दोनही मतदारसंघ नाईकांना सोडू नये, असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केले आहे.

ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. ऐरोलीमध्ये संदीप नाईक व बेलापूरमध्ये गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

रविवारी वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला. दोन्ही मतदारसंघ भाजपला दिल्यास शिवसेना नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे व विरोधात काम करण्याचे मत व्यक्त केले. सोमवारी ४० पेक्षा जास्त महत्त्वाच्या पदाधिकाºयांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपत प्रवेश देऊन त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. नवी मुंबईमधील दोनही मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद चांगली आहे. यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये येथील मतदारसंघ भाजपला दिले जाऊ नयेत. बेलापूर मतदारसंघ गणेश नाईकांना सोडू नये असा आग्रह या बैठकीमध्ये धरण्यात आला.

शिवसेना पदाधिकाºयांनी तीव्र भावना पालकमंत्र्यांजवळ व्यक्त केल्या. भाजपला दोन्ही मतदारसंघ सोडल्यास नवी मुंबईमध्ये शिवसेना कमकुवत होईलच, शिवाय ठाणे जिल्ह्यातही त्याचे गंभीर परिणाम होतील हेही निदर्शनास आणून दिले. एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाºयांच्या भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवून पक्षहिताचाच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला बेलापूरचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, नगरसेवक शहर प्रमुख विजय माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघ शिवसेनेला मिळावे अशी पदाधिकाºयांची तीव्र भावना आहे. दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडले जाऊ नये, अशी भूमिका पदाधिकाºयांनी व्यक्त केली आहे. या भावना पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांना पदाधिकाºयांच्या भावना कळविल्या. - विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख, बेलापूर

टॅग्स :Shiv Senaशिवसेना