शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मीरा-भार्इंदरमध्ये अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:43 IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे.

मीरा रोड : शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे. भाजपसोबत जाणार नाही, असं सांगणाºया शिवसेनेत मोठ्या विश्वासाने आम्ही सामील झालो; पण भाजपसोबत केलेली युती, सामाजिक सलोख्याऐवजी द्वेषकारक भूमिका आणि विकासाच्या मुद्यावर भ्रमनिरास झाल्याचे या पदाधिकाºयांनी सांगितले.राष्ट्रीय अमन मंचसह मुस्लिम समाजातील अनेकांनी २०१७ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी मुस्लिम समाजाला जोडण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु नजीकच्या काळात आलेले अनुभव आणि सेना नेते संजय राऊत यांनी बुरखा बंदीची केलेली मागणी यामुळे रविवारी सायंकाळी सेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली.मीरारोडच्या नया नगरमधील अस्मिता समीर इमारतीतील शिवसेनेच्या कार्यालयाचे फलक काढून घेण्यात आले. अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख कमल मिनाई, पदाधिकारी तथा पालिका निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार असलेले महेजबीन शेख, इस्लाम शेख, मेहमुदा नागोरी यांच्यासह जिल्हा संघटक अब्दुल रहिम शेख आदि शिवसैनिकांनी पक्षाचा राजिनामा दिल्याचे जाहीर केले .शहराचा विकास करण्यासह सत्तेत चालवलेला भ्रष्टाचार आणि दडपशाही रोखण्याची भूमिका सेनेने मांडली होती. राजकीय फायद्यासाठी शहरातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे भाजप नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न मोडून काढण्यासाठी सेनेने पुढाकार घेतला होता. या विचारांनी प्रभावित होऊन आपण सेनेत आलो होतो, असे मिनाई म्हणाले.बाळासाहेब जे बोलायचे त्या भूमिकेवर ठाम असायचे. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारवर जहरी टीका करत युती करणार नाही, असे अनेकदा सांगितले; पण तो शब्द फिरवत त्यांनी युती केली. मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांना डावलण्यासह अन्याय केला जात आहे. सेनेने भाजपशी युती केल्यावर स्थानिक पातळीवर अल्पसंख्याक म्हणून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न, तसेच दृष्टिकोन बदलला. मॉक्सस मॉलमधील दोन्ही पक्षांच्या मेळाव्यात विकासाऐवजी धार्मिक मुद्दा पुढे केल्याने आम्ही बाहेर पडल्याचे मिनाई यांनी सांगितले.‘बुरखा हा आमचा अधिकार; तो कोणीच काढून घेऊ शकत नाही’शिवसेना आमच्यासाठी काहीतरी करेल, आम्हाला सोबत घेऊन जाईल अशी आशा होती. निवडणुकीत मुस्लिमांना भाई म्हणतात; पण नंतर हिंदुत्वाचीच गोष्ट ते करत राहिले. आम्ही सोबत आहोत याचेसुद्धा त्यांना भान नव्हते. म्हणून सर्वांनी राजीनामे दिले.- मेहजबीन शेखभाजपने तलाकचा मुद्दा बनवला, तर शिवसेनेने बुरख्याचा. बुरखा हा आम्हा महिलांना धर्माने दिलेला आत्मसम्मान आहे. तो काढून घेण्याचा कोणाला अधिकार नाही. सेनेकडून अशी अपेक्षा नव्हती.- मेहमुदा नागोरीबुरखा बंदीचे वक्तव्य हे संजय राऊत यांचे व्यक्तिगत होते. स्वत: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुस्लिम धर्माविरुद्ध नसल्याचे स्पष्ट केल्याने त्या वादावर पडदा पडला आहे. पण काहींचा गैरसमज कायम असून, तो दूर करण्याचा प्रयत्न करू. शहरात सर्वच धर्मीय अनेक वर्षे मिळूनमिसळून राहत आहेत. सेनेकडे वळत असलेल्या मुस्लिम धर्मीयांमुळ बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालवला आहे.- प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर