शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

कारिवली गावांत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:04 IST

भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापत असताना कारिवली गावांत झालेल्या हाणामारीने पोलिसांची जबाबदारी वाढविली आहे. तालुक्यातील कारिवली गावांत वैभव पाटील व त्याचे भाऊ गावातील काही लोकांबरोबर राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसले असताना तेथे शिवसेनेचे उमेदवार गोकूळ नाईक हे आपल्या साथीदारांसोबत आले आणि कंपाऊंडमध्ये बसलेल्यांच्या अंगावर दगडविटांचा मारा करीत ‘तुमच्यात किती दम आहे,’ असे म्हणत मारहाण केली.या मारहाणीत वैभव पाटीलसह त्यांचा भाऊ जतीन पाटील, मित्र स्वप्नील पंडित नाईक, राहुल पाटील असे पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैभव पाटील याने भोईवाडा पोलीस ठाण्यात शिवसेना उमेदवार गोकूळ नाईकसह नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मोहीत शिवाजी पाटील याने छत्रपती पाटील यांच्या घरासमोर निवडणुकीचा राग धरून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे कारिवली गावांतील वातावरण तंग झाले असून भोईवाडा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणासही अटक केलेली नाही.

टॅग्स :bhiwandiभिवंडी