शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शिवसेना-भाजपा आमने-सामने; दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:14 IST

रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे.

डोंबिवली : रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे. फेरीवाल्यांना हटवून शिवसेनेने दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप भाजपाचे कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी करत फेरीवाल्यांसह सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास केडीएमसीने न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई केली आहे. त्यामुळे बाहेरील हद्दीत व्यवसाय करण्यावरून सध्या फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केडीएमसीच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असताना हद्दीच्या बाहेर फेरीवाल्यांना हुसकावून शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांनी दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप जाधव यांचा आहे. या दिवाळीच्या स्टॉलमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघर्ष घडवून आणणाºयांचा बंदोबस्त करा, अशी मागणी जाधव यांची आहे. स्वामिनारायण मंदिर ते रामनगर पोलीस ठाणे, असा मोर्चा काढण्यात आला. फेरीवाले व भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.‘त्यांना’ हुसकावलेले नाही - वैशाली दरेकर-राणेदिवाळीचे केवळ १० दिवस महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. तेथील फेरीवाल्यांना थोडेसे मागे सरकायला सांगितले आहे. त्यांच्या व्यवसायाला बाधा आणलेली नाही.त्यामुळे आम्ही अन्याय करतोय आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. सात ते आठ वर्षांपासून शिवसेनेकडून येथे स्टॉल लावले जात आहेत.आधी कोणाला अडचण नव्हती, पण आताच का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाजपाची भूमिका काय?आॅगस्टमध्ये हद्दीच्या बाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हुसकावून लावले होते. यावेळी त्यांनी घेतलेला आक्रमकपवित्रा चर्चेचा विषय ठरला होता. यात काही दिवस फेरीवाला संघटनेच्या नेत्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. शहराच्या बाहेरून येऊन फेरीवाले दादागिरी करत असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.सोमवारी भाजपाचेच पदाधिकारी असलेले जाधव हे मात्र हद्दीच्या बाहेर बसणाºया फेरीवाल्यांच्या बाजूने होते. त्यांनी काढलेल्या मोर्चात चव्हाण यांनी हुसकावून लावलेले फेरीवालेही सहभागी झाले होते तसेच काही फेरीवाले अतिक्रमणाविरोधात उपोषण छेडणारेही भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणेDiwaliदिवाळी