शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

शिवसेना-भाजपा आमने-सामने; दिवाळीनिमित्त स्टॉल लावण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:14 IST

रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे.

डोंबिवली : रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे. फेरीवाल्यांना हटवून शिवसेनेने दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप भाजपाचे कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी करत फेरीवाल्यांसह सोमवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी कायदा सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास केडीएमसीने न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई केली आहे. त्यामुळे बाहेरील हद्दीत व्यवसाय करण्यावरून सध्या फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. केडीएमसीच्या कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला असताना हद्दीच्या बाहेर फेरीवाल्यांना हुसकावून शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांनी दिवाळीचे स्टॉल लावल्याचा आरोप जाधव यांचा आहे. या दिवाळीच्या स्टॉलमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने भविष्यात कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संघर्ष घडवून आणणाºयांचा बंदोबस्त करा, अशी मागणी जाधव यांची आहे. स्वामिनारायण मंदिर ते रामनगर पोलीस ठाणे, असा मोर्चा काढण्यात आला. फेरीवाले व भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.‘त्यांना’ हुसकावलेले नाही - वैशाली दरेकर-राणेदिवाळीचे केवळ १० दिवस महिला बचत गटाचे स्टॉल असणार आहेत. तेथील फेरीवाल्यांना थोडेसे मागे सरकायला सांगितले आहे. त्यांच्या व्यवसायाला बाधा आणलेली नाही.त्यामुळे आम्ही अन्याय करतोय आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतोय, असे म्हणणे चुकीचे आहे. सात ते आठ वर्षांपासून शिवसेनेकडून येथे स्टॉल लावले जात आहेत.आधी कोणाला अडचण नव्हती, पण आताच का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाजपाची भूमिका काय?आॅगस्टमध्ये हद्दीच्या बाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हुसकावून लावले होते. यावेळी त्यांनी घेतलेला आक्रमकपवित्रा चर्चेचा विषय ठरला होता. यात काही दिवस फेरीवाला संघटनेच्या नेत्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. शहराच्या बाहेरून येऊन फेरीवाले दादागिरी करत असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.सोमवारी भाजपाचेच पदाधिकारी असलेले जाधव हे मात्र हद्दीच्या बाहेर बसणाºया फेरीवाल्यांच्या बाजूने होते. त्यांनी काढलेल्या मोर्चात चव्हाण यांनी हुसकावून लावलेले फेरीवालेही सहभागी झाले होते तसेच काही फेरीवाले अतिक्रमणाविरोधात उपोषण छेडणारेही भाजपाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे भाजपाची नेमकी भूमिका काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणेDiwaliदिवाळी