शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत?; उल्हासनगर महापालिकेत भाजपाचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:24 IST

कोरोनाच्या उपाययोजना बाबत उल्हासनगर महापालिकेची विशेष महासभा घ्या...उपमहापौर भगवान भालेराव

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर कोरोनाचा प्रभावी सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत विशेष महासभेची मागणी उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापौर लिलाबाई अशान यांनी केली. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य सुविधा बाबत चर्चा व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. 

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहर असल्याने, कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. मात्र काही दिवसापासून आरोग्य सुविधा बाबत अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे ठाकून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. कोरोनाचा प्रभावी सामना व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभा बोलावून चर्चा करण्याची मागणी उपमहापौर भगवान भालेराव, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वावानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, टोनी सिरवानी आदींनी एका निवेदनाद्वारे महापौर लिलाबाई अशान यांना केली. शिवसेना आघाडीतून बाहेर पडलेले उपमहापौर भगवान भालेराव सक्रिय झाल्याचे चित्र आहे. बहुतांश स्थानिक नेते, नगरसेवक कोरोना संसर्गाची भीतीने भूमिगत झाल्याने, भगवान भालेराव हे भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन आरोग्य सुविधेचा बाजू लावून धरली आहे.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी कोरोनातून बरे झाल्यावर, बुधवारी महापालिका सेवेत रुजू झाले. त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन महापालिका कोविड रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान आयुक्त दयानिधी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वस्तरातुन टीका होत आहे. तर काही वादग्रस्त अधिकाऱ्यांना जादा अधिकार दिल्याने, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यात नाराजी निर्माण झाली. अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्या बाबत विशेष महासभेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत उपमहापौर भगवान भालेराव यांनी व्यक्त केले. महापालिका अधिकाऱ्या बाबत अनेक तक्रारी असूनही अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले. 

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत? 

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ऐन महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याने, शिवसेना आघाडी सत्तेत आली. सद्यस्थितीत ओमी टीमचे नगरसेवक तटस्थ असून सत्ताधारी व शिवसेना आघाडीतील रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपचे पारडे जड झाले. एकूणच महापौर लिलाबाई अशान यांनी विशेष महासभा बोलविल्यास शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा