शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत?; उल्हासनगर महापालिकेत भाजपाचं पारडं जड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 17:24 IST

कोरोनाच्या उपाययोजना बाबत उल्हासनगर महापालिकेची विशेष महासभा घ्या...उपमहापौर भगवान भालेराव

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोनाच्या पाश्वभूमीवर कोरोनाचा प्रभावी सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत विशेष महासभेची मागणी उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापौर लिलाबाई अशान यांनी केली. रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य सुविधा बाबत चर्चा व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभेचे आयोजन केल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. 

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहर असल्याने, कोरोना प्रादुर्भाव पासून बचाव करण्यासाठी महापालिका पुढे सरसावली आहे. मात्र काही दिवसापासून आरोग्य सुविधा बाबत अनेकांनी प्रश्नचिन्हे उभे ठाकून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. कोरोनाचा प्रभावी सामना व उपाययोजना करण्यासाठी विशेष महासभा बोलावून चर्चा करण्याची मागणी उपमहापौर भगवान भालेराव, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वावानी, माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारीया, टोनी सिरवानी आदींनी एका निवेदनाद्वारे महापौर लिलाबाई अशान यांना केली. शिवसेना आघाडीतून बाहेर पडलेले उपमहापौर भगवान भालेराव सक्रिय झाल्याचे चित्र आहे. बहुतांश स्थानिक नेते, नगरसेवक कोरोना संसर्गाची भीतीने भूमिगत झाल्याने, भगवान भालेराव हे भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन आरोग्य सुविधेचा बाजू लावून धरली आहे.

 महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी कोरोनातून बरे झाल्यावर, बुधवारी महापालिका सेवेत रुजू झाले. त्यांनी विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन महापालिका कोविड रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान आयुक्त दयानिधी यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सर्वस्तरातुन टीका होत आहे. तर काही वादग्रस्त अधिकाऱ्यांना जादा अधिकार दिल्याने, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यात नाराजी निर्माण झाली. अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्या बाबत विशेष महासभेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत उपमहापौर भगवान भालेराव यांनी व्यक्त केले. महापालिका अधिकाऱ्या बाबत अनेक तक्रारी असूनही अश्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याने, महापालिका कारभारात गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मत भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी व्यक्त केले. 

महासभेत शिवसेना सापडणार कोंडीत? 

महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ऐन महापौर निवडणुकी पूर्वी भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक शिवसेनेकडे गेल्याने, शिवसेना आघाडी सत्तेत आली. सद्यस्थितीत ओमी टीमचे नगरसेवक तटस्थ असून सत्ताधारी व शिवसेना आघाडीतील रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे भाजप गोटात गेल्याने, भाजपचे पारडे जड झाले. एकूणच महापौर लिलाबाई अशान यांनी विशेष महासभा बोलविल्यास शिवसेनेची कोंडी होणार असल्याचे चित्र शहरात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा