शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

निर्णायक आघाडी मिळताच शिवसैनिकांनी घेतली आनंदाश्रमाकडे धाव, आनंद दिघे यांच्या चरणी वाहिला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 01:38 IST

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली.

- जितेंद्र कालेकरठाणे  - मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या शिवसेनेच्या राजन विचारे यांनी दुपारी ३ पर्यंत झालेल्या आठव्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर, दुसरीकडे विचारे यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन विजयापूर्वीच जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमासमोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुरुवारी निकालापूर्वीच ‘आनंदोत्सव’ साजरा केला.ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला घोडबंदर रोडवरील कासारवडवली, आनंदनगर येथील न्यू होरायझन स्कूलमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीला शिवसेना, भाजप युतीबरोबरच काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही जल्लोषाचे वातावरण होते. पहिल्याच फेरीत शिवसेनेच्या विचारे यांनी २४ हजार ३०१ मते घेतली. तर, राष्टÑवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना ११ हजार ८२१ मते मिळाली. पहिल्याच फेरीमध्ये विचारे यांनी १२ हजार ४८० मतांची आघाडी घेतली होती. पुढे १० ते १८ व्या फेरीपर्यंतही त्यांनी ही आघाडी कायम ठेवली. अठराव्या फेरीमध्ये विचारेंना चार लाख ५६ हजार १८१ मते मिळाली. तर, परांजपे यांना एक लाख ९७ हजार २०२ मते मिळाली. यातही दोन लाख ५८ हजार ९७९ मतांची विचारेंना आघाडी मिळाली. त्यामुळे विचारेंच्या विजयावर शिक्कामोर्तब करून शिवसेनेने टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमसमोर फटाक्यांची आतषबाजी करून धूमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांना पेढा भरवत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख रमेश वैती, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, आदी उपस्थित होते.नेत्यांच्या हाती ढोल आणि बॅन्जोवर कार्यकर्ते थिरकले!कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे छोटे कटआउट हाती घेऊन, तर काहींनी मोदी यांचे मुखवटे परिधान करून वंदे मातरम्... भारत माता की जय... मोदी मोदी... अशा घोषणाही कार्यकर्ते देत जल्लोषात सहभागी झाले होते. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅन्जो सुरू असताना आमदार केळकर यांनी ढोल हाती घेऊन तो वाजवला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thane-pcठाणे