शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

शिवजयंतीलाही आचारसंहितेचा फटका, शहरात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:56 IST

शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे.

ठाणे - शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे. या उत्सवात सर्वपक्षीय नेते आणि ठाणेकर सहभागी होत असतात. त्यातून कोणताही निवडणूक प्रचार होत नाही किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचेही प्रयत्न होत नाहीत. परंतु, असे असतानाही पालिकेने अचानक अशा प्रकारचे पाऊल उचलण्याने शिवभक्तांत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.ठाणे महापालिकेच्यावतीने २३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. मासुंदा तलावापासून निघाणारी ही मिरवणूक बाजारपेठेतून मार्गक्र मण करून गडकरी रंगायतन येथे विसर्जीत केली जाते.शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ठाण्यातील मान्यवर या सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता असल्याने पालिकेने शिवजयंती साजरी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्र ीया व्यक्त होत आहेत.आचारसंहिता लागू असताना पालिका वेगवेगळ्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करत आहे. यापूर्वी आचारसंहिता असतानाही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपुजन सोहळेसुद्धा पार पडले होते. मात्र, आता आचारसंहितेच्या नावाखाली परंपरागत शिवजयंती सोहळा रद्द करण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. या सोहळ्यातून कोणताही राजकीय पक्षाचा प्रचार केला जात नाही. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली सोहळा रद्द करणे योग्य नाही. प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाआचारसंहितेच्या काळात राजकीय कार्यक्रमांवर बंदी असते. मात्र, कदाचित राजकारणी मंडळी शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकरणासाठी करतात हे कदाचित पालिकेच्या लक्षात आले असावे म्हणूनच अशा पद्धतीने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. परंतु, पालिकेने या निर्णयाचा फेरविचार करावा.- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते-ठामपा)

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका