शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सेना-भाजप संघर्षामुळे ठाण्यातील तलाव सुशोभीकरण रखडले; पालिकेकडे मागितले सातबारा

By अजित मांडके | Updated: June 4, 2025 12:38 IST

६.७१ कोटी मिळाल्यानंतर काम ठप्प

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या सहा तलावांच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून अपेक्षित असलेला निधी शिंदे सेना आणि भाजपमधील सुप्त संघर्षात रखडल्याचे आता समोर आले आहे. राज्य तलाव संवर्धन योजनेंतर्गत या कामासाठी पहिल्या टप्प्यात ६.७१ कोटींचा निधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महापालिकेला प्राप्त झाला. परंतु उर्वरित निधी मिळविण्यात मोठी अडचण निर्माण झाली. या सहा तलावांचे सातबारे किंवा प्रॉपर्टी कार्ड महापालिकेकडे आहे का, असा सवाल आता अचानक राज्य शासनाने केल्याने ठाणे महापालिकेचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. त्यामुळे ब्रिटिशकालीन पुराव्यांची महापालिकेकडून शोधाशोध सुरू झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी ६५ तलाव होते. परंतु ठाण्याचा विकास झाल्यामुळे तलावांची संख्या ३५ वर आली. त्यातील मासुंदा, उपवन आणि कचराळी तलाव यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परंतु आता केंद्राच्या अमृत-दोन योजनेंतर्गत इतर तलावांचे सुशोभीकरण होणार असून त्यासाठी २० कोटी १३ लाखांचा खर्च केला जाणार आहे. 

सुकाणू समितीच्या बैठकीतच मंजुरी

शासनाच्या सुकाणू समितीच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. या कामात २० सप्टेंबर २०२४ रोजी काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर महापालिकेने त्याचे निराकरण केले. तलाव संवर्धन योजनेंतर्गत या कामासाठी ७० टक्के निधी हा शासनाचा आणि ३० टक्के निधी हा महापालिकेचा राहणार आहे.

सुकाणू समितीच्या बैठकीतच मंजुरी

शासनाच्या सुकाणू समितीच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. या कामात २० सप्टेंबर २०२४ रोजी काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर महापालिकेने त्याचे निराकरण केले. तलाव संवर्धन योजनेंतर्गत या कामासाठी ७० टक्के निधी हा शासनाचा आणि ३० टक्के निधी हा महापालिकेचा राहणार आहे.

सातबारा दाखवा

मार्च महिन्यात राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने या सहा तलावांचे सातबारे किंवा प्रॉपर्टी कार्ड सादर करण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले. हे पुरावे सादर केल्यानंतरच उर्वरित निधी आणि प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. यापूर्वी तलावांचे सुशोभीकरण किंवा संवर्धनाचे काम केंद्र शासनाच्या अमृत तसेच राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून केले होते. परंतु तेव्हा अशा प्रकारचे पुरावे मागण्यात आले नव्हते. आता महापालिकेच्या संबंधित विभागाने तहसीलदार, तलाठी, नगर भूमापन या विभागांशी संपर्क साधला असून, पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. परंतु हे ब्रिटिशकालीन पुरावे सापडणार का, असा सवाल महापालिकेला सतावू लागला आहे.

वादाचा फटका

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर त्यांनी यापूर्वी झालेल्या कामांचे ऑडिट केले. तसेच काही कामांना जर अधिकचा निधी मंजूर झाला असेल तर त्या कामांना ब्रेक लावण्याबरोबरच निधीही थांबविला. त्याचाच फटका आता ठाण्यातील सहा तलावांच्या कामांना बसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा