शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय गप्प बसणार नाही: तानाजी सावंतांनी दिला विरोधकांना इशारा

By अजित मांडके | Updated: April 22, 2023 16:58 IST

मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हापकीन वरुन मला डिवचले जात आहे. मात्र इलेक्ट्रील इंजिनिअर, शुगरमध्ये पीएचडी केलेली आहे, आणि मी स्वत: रिसर्चर आहे. त्यामुळे मला डिवचू नका अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला आहे.

मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचा समाचार शनिवारी त्यांनी ठाण्यातील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलच्या भुमीपुजनाच्या निमित्ताने घेतला. १९८६ मध्ये इलेक्ट्रीक इंजिनिअरींगमध्ये गोल्ड मीडल मिळविले आहे. त्यानंतर लेक्चरर म्हणून काम केले. पुढे पूण्यात २००१ पासून १०० इस्टंट्युट चालवत आहे. २००८ मध्ये पहिला साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याचे ८ कारखाने झाले आहेत. मी मेहनतीवर साखर कारखाने उभे केले आहेत, कोणाकडून विकत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टिका केली. मी रिर्सचस असल्याने आता आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहेत. येत्या १० दिवसात ते प्राधिकरण अस्तिवात येईल असेही ते म्हणाले.

येत्या काळात महाराष्ट्रात हेल्थकार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम हे १८ महिन्यात पूर्ण झाले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी मी वेगळ्या पध्दतीने काम करीत असून प्रत्येक महिन्याचा कामकाजाचा डेटा मी घेणार आहे. त्यामुळे वेळेत काम करण्याची तंबीच त्यांनी यावेळी दिली. कोरोना वाढत असला तरी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले परंतु आजार अंगावर काढू नका असेही त्यांनी सांगितले. टाक्सफोर्सची शुक्रवारी बैठक घेण्यात आली असून १५ मे पर्यंत कोरोना ओसरलेला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कोरोना वाढतो म्हणून आम्ही लगेच लॉकडाऊन करणार नाही, आधीचे सरकार असते तर त्यांनी लगेच लॉकडाऊन केला असता असा टोलाही त्यांनी लगावला.

कपील पाटील - ग्रामीण भागात कोणीही डॉक्टर टिकत नाही. इंटनशीप झाली की लगेच निघून जातात. एकीकडे विकास सुरु आहे. तर ग्रामीणमध्ये सुविधा नसल्याचे दिसत आहे. बदलापुरचे रुग्णालय १०० बेडचे करावे, शहापुर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरु करावे, सुपरस्पेशलीटी हॉस्पीटल असे निर्माण करावे की एकाही रुग्णाला मुंबईला जाण्याची वेळ येऊ नये अशी मागणी केंद्रीय पचांयत राजमंत्री कपील पाटील यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :thaneठाणेTanaji Sawantतानाजी सावंत