शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

अंबरनाथमधील महावितरणच्या धोकादायक इमारतीवर शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:03 IST

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

अंबरनाथ : येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या स्लॅबमधील सर्व लोखंड गंजले असून अनेक ठिकाणी स्लॅब कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होते. या इमारतीची अवस्था पाहता दुरुस्तीची गरज आहे. मात्र, महावितरणने दुरुस्ती न करता त्या इमारतीवर थेट लोखंडी खांब टाकून त्यावर पत्रे टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच धोकादायक झालेल्या या इमारतीवर लोखंडाचे वजन पडल्याने हा धोका वाढणार आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी केली जात आहे.कल्याण-बदलापूर रस्त्यावरील महावितरण विभागाचे वीजबिल भरणा केंद्र आणि त्यात असलेले कार्यालय हे सध्या धोक्यात आहे. ज्या इमारतीत हे कार्यालय आहे, ती इमारत अनेक ठिकाणी खचण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. अनेक ठिकाणी स्लॅबमधील खांबांचे गंजलेले लोखंडही दिसत आहे. काही ठिकाणी तर स्लॅब निखळून पडला आहे. असे असतानाही त्या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. इमारत धोकादायक असतानाही त्यात कर्मचारी काम करत आहेत. तर, दुसरीकडे या धोकादायक अवस्थेतील इमारतीत वीजबिल भरले जात असल्याने ग्राहकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी इमारतीची पाहणी केली असता दुरुस्तीची मागणी केली आहे. इमारत धोकादायक असतानाही या इमारतीवर लोखंडी रॉड टाकून छत टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच इमारतीमधील स्लीट गंजलेले असताना त्यावर अतिरिक्त भार टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही इमारत खचण्याचा धोका वाढला आहे. यासंदर्भात पाटील यांनी महावितरण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातही संपर्क साधून छताचे काम न करता आधी इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात महावितरणचे अधिकारीही बोलण्यास तयार नाही. ज्या इमारतीच्या आवारात अधिकारी बसतात, त्याच इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. या इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत कर्मचारी उघडपणे बोलत आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करते, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इमारतीला पावसात गळती लागत असल्याने इमारतीवर छत टाकले जात आहे. प्रत्यक्षात इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल, एवढेच उत्तर त्यांनी यावेळी दिले.मनसेचे आंदोलनअंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या खंडित वीजपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार नियमित घडत असताना महावितरण विभागाचे अधिकारी नागरिकांना सहकार्य करत नाहीत. या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, संदीप लकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अधिकाºयांना कंदील भेट देत नागरिकांच्या त्रासाची कल्पना दिली.वीजबिल भरणा केंद्रातील इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करून इमारतीच्या स्थितीचे अवलोकन केले पाहिजे. तसेच त्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून त्यावर छत टाकणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करताच थेट छत टाकणे म्हणजे इमारतीला धोका निर्माण होईल.- उमेश पाटील, नगरसेवक

टॅग्स :mahavitaranमहावितरण