शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

अंबरनाथमधील महावितरणच्या धोकादायक इमारतीवर शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:03 IST

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

अंबरनाथ : येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीच्या स्लॅबमधील सर्व लोखंड गंजले असून अनेक ठिकाणी स्लॅब कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती होते. या इमारतीची अवस्था पाहता दुरुस्तीची गरज आहे. मात्र, महावितरणने दुरुस्ती न करता त्या इमारतीवर थेट लोखंडी खांब टाकून त्यावर पत्रे टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच धोकादायक झालेल्या या इमारतीवर लोखंडाचे वजन पडल्याने हा धोका वाढणार आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी केली जात आहे.कल्याण-बदलापूर रस्त्यावरील महावितरण विभागाचे वीजबिल भरणा केंद्र आणि त्यात असलेले कार्यालय हे सध्या धोक्यात आहे. ज्या इमारतीत हे कार्यालय आहे, ती इमारत अनेक ठिकाणी खचण्याच्या मार्गावर आहे. या इमारतीच्या स्लॅबला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. अनेक ठिकाणी स्लॅबमधील खांबांचे गंजलेले लोखंडही दिसत आहे. काही ठिकाणी तर स्लॅब निखळून पडला आहे. असे असतानाही त्या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. इमारत धोकादायक असतानाही त्यात कर्मचारी काम करत आहेत. तर, दुसरीकडे या धोकादायक अवस्थेतील इमारतीत वीजबिल भरले जात असल्याने ग्राहकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक उमेश पाटील यांनी इमारतीची पाहणी केली असता दुरुस्तीची मागणी केली आहे. इमारत धोकादायक असतानाही या इमारतीवर लोखंडी रॉड टाकून छत टाकण्याचे काम सुरू केले आहे. आधीच इमारतीमधील स्लीट गंजलेले असताना त्यावर अतिरिक्त भार टाकण्यात येत आहे. त्यामुळे ही इमारत खचण्याचा धोका वाढला आहे. यासंदर्भात पाटील यांनी महावितरण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातही संपर्क साधून छताचे काम न करता आधी इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात महावितरणचे अधिकारीही बोलण्यास तयार नाही. ज्या इमारतीच्या आवारात अधिकारी बसतात, त्याच इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. या इमारतीच्या धोकादायक स्थितीबाबत कर्मचारी उघडपणे बोलत आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालय त्याकडे दुर्लक्ष करते, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इमारतीला पावसात गळती लागत असल्याने इमारतीवर छत टाकले जात आहे. प्रत्यक्षात इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात अंबरनाथ कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठ कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल, एवढेच उत्तर त्यांनी यावेळी दिले.मनसेचे आंदोलनअंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. या खंडित वीजपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकार नियमित घडत असताना महावितरण विभागाचे अधिकारी नागरिकांना सहकार्य करत नाहीत. या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, संदीप लकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. अधिकाºयांना कंदील भेट देत नागरिकांच्या त्रासाची कल्पना दिली.वीजबिल भरणा केंद्रातील इमारत धोकादायक स्थितीत आहे. त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करून इमारतीच्या स्थितीचे अवलोकन केले पाहिजे. तसेच त्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करून त्यावर छत टाकणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करताच थेट छत टाकणे म्हणजे इमारतीला धोका निर्माण होईल.- उमेश पाटील, नगरसेवक

टॅग्स :mahavitaranमहावितरण