शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अखेर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : गेल्या आठ वर्षांपासून विविध कारणाने बंद असलेला अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : गेल्या आठ वर्षांपासून विविध कारणाने बंद असलेला अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. एमआयडीसीतील एका कंपनीचे प्रक्रिया केलेले पाणी केंद्रात सोडून बुधवारी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे कंपन्यांतील प्रदूषित पाणी प्रक्रिया करून कल्याणच्या खाडीत सोडण्यात येणार असल्याने अंबरनाथमधील प्रदूषणाचा त्रास कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या हस्ते आनंदनगर अतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा)चे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या उपस्थितीत क्रिस्टल ॲक्वाकेम कंपनीतील प्रक्रिया केलेले पाणी प्रायोगिक तत्त्वावर सीईटीपी केंद्रात सोडण्यात आले. येत्या काही महिन्यात एमआयडीसीतील १२० रासायनिक कंपन्यांतील पाणी प्रक्रिया केंद्रात जमा करून ते थेट कल्याणच्या खाडीपर्यंत नेऊन सोडण्यात येणार आहे. यामुळे शहरातील जलप्रदूषणाला आळा बसणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.

सीईटीपी प्रकल्पाला २०१३मध्ये सुरुवात झाली होती. २०१६ मध्ये ‘आमा’कडे त्याचा ताबा देण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडले होते. सात एमएलडी क्षमता असलेल्या प्रकल्पात १२० कंपन्यांमधील रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित नसल्याने एमआयडीसीतील काही कंपन्या अन्य राज्यात स्थलांतरित झाल्या. काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले होते. त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला होता; मात्र प्रकल्प कार्यान्वित झाल्याने उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे तायडे म्हणाले.

एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आमा यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या सीईटीपी प्रकल्पामुळे कारखानदारांचे उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यांनतर एमआयडीसीमधील रासायनिक पाण्याचा थेंबही वालधुनी नदीमध्ये जाणार नाही अशी ग्वाही तायडे यांनी यावेळी दिली. सी.एस. निखार, मकरंद पवार, संदीप तोंडापूरकर आदी उपस्थित होते.