शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वा. सावरकरांचे पत्र विचारात न घेतल्याने देश आज अडचणीत, शरद पोंक्षे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 05:10 IST

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला.

डोंबिवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पंडित नेहरू यांना पत्र पाठवून काही गोष्टी तातडीने करण्यास सांगितल्या होत्या. त्यात पहिला मुद्दा हिंदुस्थान हा एक खंडप्राय देश होता, तो एक राष्ट्र म्हणून उभा राहिला पाहिजे. जगातील सर्व देशांना हिंदुस्थान कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो, हे स्पष्ट समजले पाहिजे. त्यासाठी सीमारेषाही ठळक असल्या पाहिजेत. पण, त्याकडे तत्कालीन सरकारने लक्ष न दिल्याने आज आजूबाजूच्या देशातील नागरिक कधीही आपली सीमारेषा ओलांडत आहेत. त्यांना रोखण्याचे आव्हान आहे, अशी टीका अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी केली.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. टिळकनगर शाळेच्या पटांगणात रविवारी हा कार्यक्रम झाला. पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व ५१ हजार रु. रोख असे होते. यंदा या पुरस्काराचे १८ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर पोंक्षे यांनी ‘सावरकर विचार दर्शन’ यावर विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी आशीर्वाद बोंद्रे, डॉ. महेश ठाकूर, श्रीकांत पावगी आदी मान्यवर उपस्थित होते.‘सावरकरांचे न ऐकल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिक भारतात घुसखोरी करत आहेत. देश बलवान व महासत्ता होण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी व्यक्ती आणि अंतर्गत सुरक्षा पाहणारे पोलीस दलातील व्यक्ती सक्षम असणे गरजेचे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मेरिट मिळविणाऱ्या मुलांच्या मुलाखती माध्यमांवर प्रसारित केल्या जातात. पण, त्यातील किती मुले आम्हाला शिक्षक, सैनिक आणि पोलीस व्हायचे आहे, असे सांगतात? कारण, त्यांना आपण सक्षम केले नाही. २५ वर्षांपूर्वी शिक्षकीपेक्षाला जो मान होता, तो आता उरलेला नाही. सावरकरांचे विचार अमलात आणले असते, तर आज देश कुठच्या कुठे प्रगती करू शकला असता’, असे पोंक्षे म्हणाले.सप्तसिंधू नदीच्या तिरावर राहणारे ते हिंदू. हिंदू धर्म आहे, संस्था नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. एका माणसाने दुसºया माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजे हिंदू असणे आहे. मी हिंदू आहे, त्यातच सेक्युलर असणे आहे. हिंदुत्ववादी संघटनांना आम्ही सेक्लुरवादी आहे, हे बोलण्याची गरज नाही. कारण, आमच्या रक्तात आम्ही सेक्युलरवादी आहोत हे आहे. सेक्युलरालिझम म्हणजे धर्माची लुडबुड. ती दररोजच्या जीवनात चालणार नाही. जे पक्ष आपण सेक्युलर आहे, असे बोलतात, ते याप्रमाणे वागतात का, ते तुम्ही पाहा. बाकी सगळे धर्म नाही. धर्म संस्था आहेत, असे पोंक्षे म्हणाले.आयुष्यभर देवाची पूजा न करणाराही हिंदू असतो, हेच हिंदू धर्माचे सौंदर्य आहे. हिंदूंची ओळख मी उत्तम माणूस आहे. गणवेश घालून आम्हाला फिरवावे लागत नाही. हा हिंदू धर्म जातीपातीत विखुरला गेला आहे. जातीच्या भिंती तोडून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. सावरकरांची लढाई मनुष्यधर्मासाठीची होती. सावरकरांचे अंतिम ध्येय कोणी विचारले तर त्यांनी सांगितले होते की, माझी जात मनुष्य, धर्म माणुसकी व देशाचे नाव पृथ्वी सांगायला आवडेल. पण, त्यापूर्वी सर्वांना एकत्र आणले पाहिजे, असे ते म्हणाले.- इंग्रजी भाषेत स्वर आणि व्यंजने मिक्स आहेत. कुठे उच्चार सायलेंट होतात, हे असे आपल्या भाषेत काही नाही. आपली भाषा स्पष्ट आहे, म्हणून तिचा अभिमान बाळगा. एखाद्या भाषेचा अभिमान का बाळगावा, त्याचे ठोस कारण पाहिजे.भाषेसाठी सावरकरांची पुस्तके वाचा. शिवाजी महाराजांनंतर भाषा शुद्धीकरणाचे काम सावरकरांनी केले आहे. दूरदर्शन, महाविद्यालय, विधिमंडळ, मुख्याध्यापक हे सर्व शब्द आपल्याला सावरकरांची देण आहे, असे पोंक्षे म्हणाले.

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षे