शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

स्वा. सावरकरांचे पत्र विचारात न घेतल्याने देश आज अडचणीत, शरद पोंक्षे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 05:10 IST

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला.

डोंबिवली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पंडित नेहरू यांना पत्र पाठवून काही गोष्टी तातडीने करण्यास सांगितल्या होत्या. त्यात पहिला मुद्दा हिंदुस्थान हा एक खंडप्राय देश होता, तो एक राष्ट्र म्हणून उभा राहिला पाहिजे. जगातील सर्व देशांना हिंदुस्थान कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो, हे स्पष्ट समजले पाहिजे. त्यासाठी सीमारेषाही ठळक असल्या पाहिजेत. पण, त्याकडे तत्कालीन सरकारने लक्ष न दिल्याने आज आजूबाजूच्या देशातील नागरिक कधीही आपली सीमारेषा ओलांडत आहेत. त्यांना रोखण्याचे आव्हान आहे, अशी टीका अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी केली.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वा. सावरकर पुरस्कार मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. टिळकनगर शाळेच्या पटांगणात रविवारी हा कार्यक्रम झाला. पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व ५१ हजार रु. रोख असे होते. यंदा या पुरस्काराचे १८ वे वर्ष आहे. या पुरस्कार सोहळ्यानंतर पोंक्षे यांनी ‘सावरकर विचार दर्शन’ यावर विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी आशीर्वाद बोंद्रे, डॉ. महेश ठाकूर, श्रीकांत पावगी आदी मान्यवर उपस्थित होते.‘सावरकरांचे न ऐकल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिक भारतात घुसखोरी करत आहेत. देश बलवान व महासत्ता होण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी व्यक्ती आणि अंतर्गत सुरक्षा पाहणारे पोलीस दलातील व्यक्ती सक्षम असणे गरजेचे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मेरिट मिळविणाऱ्या मुलांच्या मुलाखती माध्यमांवर प्रसारित केल्या जातात. पण, त्यातील किती मुले आम्हाला शिक्षक, सैनिक आणि पोलीस व्हायचे आहे, असे सांगतात? कारण, त्यांना आपण सक्षम केले नाही. २५ वर्षांपूर्वी शिक्षकीपेक्षाला जो मान होता, तो आता उरलेला नाही. सावरकरांचे विचार अमलात आणले असते, तर आज देश कुठच्या कुठे प्रगती करू शकला असता’, असे पोंक्षे म्हणाले.सप्तसिंधू नदीच्या तिरावर राहणारे ते हिंदू. हिंदू धर्म आहे, संस्था नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. एका माणसाने दुसºया माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजे हिंदू असणे आहे. मी हिंदू आहे, त्यातच सेक्युलर असणे आहे. हिंदुत्ववादी संघटनांना आम्ही सेक्लुरवादी आहे, हे बोलण्याची गरज नाही. कारण, आमच्या रक्तात आम्ही सेक्युलरवादी आहोत हे आहे. सेक्युलरालिझम म्हणजे धर्माची लुडबुड. ती दररोजच्या जीवनात चालणार नाही. जे पक्ष आपण सेक्युलर आहे, असे बोलतात, ते याप्रमाणे वागतात का, ते तुम्ही पाहा. बाकी सगळे धर्म नाही. धर्म संस्था आहेत, असे पोंक्षे म्हणाले.आयुष्यभर देवाची पूजा न करणाराही हिंदू असतो, हेच हिंदू धर्माचे सौंदर्य आहे. हिंदूंची ओळख मी उत्तम माणूस आहे. गणवेश घालून आम्हाला फिरवावे लागत नाही. हा हिंदू धर्म जातीपातीत विखुरला गेला आहे. जातीच्या भिंती तोडून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे. सावरकरांची लढाई मनुष्यधर्मासाठीची होती. सावरकरांचे अंतिम ध्येय कोणी विचारले तर त्यांनी सांगितले होते की, माझी जात मनुष्य, धर्म माणुसकी व देशाचे नाव पृथ्वी सांगायला आवडेल. पण, त्यापूर्वी सर्वांना एकत्र आणले पाहिजे, असे ते म्हणाले.- इंग्रजी भाषेत स्वर आणि व्यंजने मिक्स आहेत. कुठे उच्चार सायलेंट होतात, हे असे आपल्या भाषेत काही नाही. आपली भाषा स्पष्ट आहे, म्हणून तिचा अभिमान बाळगा. एखाद्या भाषेचा अभिमान का बाळगावा, त्याचे ठोस कारण पाहिजे.भाषेसाठी सावरकरांची पुस्तके वाचा. शिवाजी महाराजांनंतर भाषा शुद्धीकरणाचे काम सावरकरांनी केले आहे. दूरदर्शन, महाविद्यालय, विधिमंडळ, मुख्याध्यापक हे सर्व शब्द आपल्याला सावरकरांची देण आहे, असे पोंक्षे म्हणाले.

टॅग्स :Sharad Ponksheशरद पोंक्षे