शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचे ठाणे जिल्ह्यावर लक्ष! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 17:34 IST

लोकसभा निवडणुकीत पक्षाने ठाणे व कल्याण जागा लढविल्या होत्या. तर ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार आहेत.

ठाणे : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ठाणे जिल्ह्यातील कामगिरी सुधारण्यासाठी पक्षाध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी स्वतः लक्ष देण्याचे ठरविले आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पक्षाच्या राजकीय स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर शनिवारी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने ठाणे व कल्याण जागा लढविल्या होत्या. तर ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार आमदार आहेत. मात्र, कळवा-मुंब्रा वगळता उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट झाली होती. भिवंडी मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव यांनी पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीकडे पक्षाध्यक्षांचे लक्ष वेधले. तसेच पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी साकडे घातले. त्यावेळी पवार यांनी आपण विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यावर स्वतः लक्ष देणार असल्याचे जाहीर केले.

ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या 18 जागा असून, आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व 18 जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात मोठे यश मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या संदर्भात येत्या शनिवारी (1 जून) मुंबईत बैठक होणार आहे. त्यात पक्षाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस