शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांवर टीका केली जाते; सुप्रिया सुळेंचा टोला

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 27, 2023 18:02 IST

सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला.

ठाणे - दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडण बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेले अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली त्याच्यात हा विचार अनेक दशक आमच्या कुटुंबात आहेत. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा ताई करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्ही सगळ्या शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच पण शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले. सावित्री बईंमुळे आम्ही शिकलो, आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत आहोत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. मला अस वाटत राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी आहे. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज मी पेपरमध्ये वाचले २६०० कोटींची मागणी केली आहे पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालं आहे. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीने केंद्रातून टीम यायची.ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे पाहणी केली पाहिजे आणि त्यांची नोंद झाली पाहिजे. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार