शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा शरद पवारांवर टीका केली जाते; सुप्रिया सुळेंचा टोला

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 27, 2023 18:02 IST

सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला.

ठाणे - दगडफेकीतील आरोपीसोबत फोटो एकट्या पवारांचे नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केट मध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचे नाव घेतले जाते. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये ६ दशके हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडण बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळ अंदाधुंदी आहे असा टोला भुजबळांना लगावला.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेले अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली त्याच्यात हा विचार अनेक दशक आमच्या कुटुंबात आहेत. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा ताई करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आम्ही सगळ्या शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच पण शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले. सावित्री बईंमुळे आम्ही शिकलो, आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत आहोत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. मला अस वाटत राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी आहे. राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज मी पेपरमध्ये वाचले २६०० कोटींची मागणी केली आहे पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालं आहे. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीने केंद्रातून टीम यायची.ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे पाहणी केली पाहिजे आणि त्यांची नोंद झाली पाहिजे. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार