शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मीरारोडमधील शांती पार्क भूखंडाचा वादा, हक्काची जागा बळकावल्याचा रहिवाशांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 13:56 IST

आमच्या हक्काच्या जागा बळकावण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये उमटली आहे.

मीरारोड - मीरारोडच्या शांतीपार्कमधील काही कोटी किमतीच्या आरजी भूखंडातील बेकायदा बांधकाम महापालिकेने ६ वर्षापूर्वी अनधिकृत ठरवून तोडण्याची काढलेली नोटीस, बेकायदा धार्मिक स्थळं तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, रहिवाशांनी न्यायालयात घेतलेली धाव तरी देखील महासभेत मात्र सदर भूखंड अनधिकृत बांधकाम करणा-या संस्थेलाच भाडे तत्त्वावर देण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने केल्याने हा तर आमच्या हक्काच्या जागा बळकावण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये उमटली आहे.मंजूर बांधकाम नकाशे व नियमानुसार सदनिका खरेदी धारक रहिवाशांना मोकळ्या जागा अर्थात ओपन स्पेस व आरजी म्हणजेच रिक्रिएन्शल ग्राऊंड जागा सोडणं बंधनकारक आहे. मीरारोडच्या शांती पार्क या वसाहतीमध्ये देखील अशा प्रकारे सोडलेल्या आरजी व खुल्या जागा या कायदे-नियमानुसार स्थानिक रहिवाशांच्या हक्काच्या व मालकीच्या असतात. तसं असताना काही राजकारणी, पालिका अधिकारी यांच्या संगनमताने काही संस्था - व्यक्तींनी रहिवाशांच्या हक्काच्या आरजी व ओपन स्पेस बळकावलेल्या आहेत.

या ठिकाणी त्यांनी अनधिकृत बांधकामे करुन त्यात हॉल, धार्मिक स्थळे, पक्ष कार्यालये आदी विविध प्रकारची बेकायदा बांधकामे झालेली आहेत. सर्वसामान्य नागरीकांना आरजी व ओपन स्पेस या आपल्या हक्काच्या जागा असल्याची नसलेली माहिती, किंवा बांधकामे होत असताना रहिवाशांनी तक्रारी करुन देखील पालिके कडुन न केली जाणारी कारवाई या मुळे शांती पार्कमधील रहिवाशांच्या हक्काच्या कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनी या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे करुन बळकावण्यात आलेल्या आहेत.२०१२ साली सदर आरजीमधील बांधकामे ही अनधिकृत ठरवून ती पाडून टाकण्याचा निर्णय महापालिकेचे तत्कालिन उपायुक्त सुधीर राऊत यांनी दिला होता. पण त्या नंतरही सदर बांधकामांवर पालिकेने काहीच कारवाई केली नाही. उलट अतिक्रमण करणारयांना पालिकेने कर आकारणी पासून पाणी आदी विविध सुविधा पुरवल्या. तर वीज पुरवठा सुद्धा सहज मिळाला. २०१५ साली तर महापालिकेने सदर आरजीच्या जागा चक्क अनधिकृत बांधकाम न हटवताच देखभालीच्या नावाखाली करारनामा करुन विकासकाकडून ताब्यात घेतल्या.येथील एका मोठ्या आरजीमध्ये गोर्वधन हवेली व जय गोपाल हवेली अशा दोन संस्थांनी धार्मिकस्थळ व हॉल आदी बांधकामे बेकायदा केली आहेत. यातील आरजीची जागा ही जय श्री गोपाळ मंडळ मुंबई या बेकायदा बांधकाम करणारया संस्थेलाच देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा ठराव मागील महासभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला होता.वास्तविक स्थानिक रहिवाशांच्या गोकुळ शांती वेलफेअर असोसिएशनने सदर आरजी जागेत चालणारया गैरवापराविरोधात २०१७ साली उच्च न्यायालयात याचीका दाखल केलेली आहे. तर त्या आधीच्या असलेल्या तक्रारी , पालिकेने सदर बांधकामे अनधिकृत घोषित करुन ती पाडण्याचे दिलेले पूर्वीचे आदेश पाहता सदर रहिवाशांच्या हक्काची जागा महासभेत ठराव करुन अतिक्रमण करणा-या संस्थेलाच देखभाली साठी दिल्या बद्दल रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय. शिवाय उच्च न्यायालयाने बेकायदा धार्मिक स्थळं पाडण्याच्या आदेशाचादेखील पालिकेने उल्लंघन व अवमान केल्याचे काही रहिवाशांचे म्हणणे आहे.दरम्यान सोमवारी रहिवाशांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांची भेट घेऊन महासभेच्या ठरावा बद्दल संताप व्यक्त करतानाच आमच्या हक्काची जागा त्यातील अनधिकृत बांधकामे तोडून आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. आयुक्तांनी देखील आठवड्याभरात यावर माहिती घेऊन योग्य कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्याचे रहिवाशांनी सांगीतले.रहिवाशांच्या हक्काच्या आरजी जागेत असणारे अतिक्रमण व अनधिकृत याची पूर्ण कल्पना असताना देखील ते तोडण्याची कारवाई न करता पालिका व सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर डोळेझाक केल्याचा संताप व्यक्त होत आहे. तर आमच्या हक्काच्या जागाच आता लाटण्याचा डाव सुरु झाल्याचा आरोप करत रहिवाशांनी निर्णायक लढा लढण्याचा निर्धार केलाय. 

टॅग्स :BJPभाजपा