शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

श्रमजीवींचा ठाण्यात बुधवारी ‘शिमगा मोर्चा’

By admin | Updated: March 14, 2017 01:23 IST

आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली

ठाणे : आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली भांडवलदारांचे हित साधत आहेत. अशा या सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटना १५ मार्चला होळीची बोंब मारणारा ‘शिमगा मोर्चा’ काढणार आहे. यावेळी आदिवासी रंगीबेरंगी पोषाख परिधान करून वेगवेगळ्या रूपांची सोंगे घेऊन या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आदिवासींची मुले कुपोषणाने मृत्युमुखी जात असली तरी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना खास कोंबड्याची भेट मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे कार्यकर्ते ट्रक, टेम्पोने हजारोच्या संख्येने येणार आहेत. मरणाच्या दारात असलेल्या कुपोषित बालकाना वाचवण्यासाठी रोजगार हमीच्या कामांची थकवलेली मजुरी द्या, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी, अंत्योदय योजनेचा लाभ द्या, सरकारी, खाजगी, वनजागेवरील घर नावे करा, समान कामाला समान वेतन , अन्न, पाणी, निवारा आदी हक्क प्राप्त करण्यासाठी हा शिमगा मार्चा काढला जात आहे.याशिवाय ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, रायगड जिल्ह्यासोबतच राज्यातील आदिवासींच्या मूलभूत गरजांबाबत शिमगा मोर्चाव्दारे श्रमजीवी सरकारला जाब विचारणार आहेत. या मोर्चेकरांना विवेक व विद्युल्ल्ता पंडित हे मार्गर्शन करणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तात्रेय कोळेकर, अशोक सापटे, सुरेश रेंजड, लक्ष्मण पडवळ, आदी करणार असून त्यासाठी जनजागृती व नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.(प्रतिनिधी)