शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

श्रमजीवींचा ठाण्यात बुधवारी ‘शिमगा मोर्चा’

By admin | Updated: March 14, 2017 01:23 IST

आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली

ठाणे : आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली भांडवलदारांचे हित साधत आहेत. अशा या सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटना १५ मार्चला होळीची बोंब मारणारा ‘शिमगा मोर्चा’ काढणार आहे. यावेळी आदिवासी रंगीबेरंगी पोषाख परिधान करून वेगवेगळ्या रूपांची सोंगे घेऊन या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आदिवासींची मुले कुपोषणाने मृत्युमुखी जात असली तरी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना खास कोंबड्याची भेट मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे कार्यकर्ते ट्रक, टेम्पोने हजारोच्या संख्येने येणार आहेत. मरणाच्या दारात असलेल्या कुपोषित बालकाना वाचवण्यासाठी रोजगार हमीच्या कामांची थकवलेली मजुरी द्या, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी, अंत्योदय योजनेचा लाभ द्या, सरकारी, खाजगी, वनजागेवरील घर नावे करा, समान कामाला समान वेतन , अन्न, पाणी, निवारा आदी हक्क प्राप्त करण्यासाठी हा शिमगा मार्चा काढला जात आहे.याशिवाय ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, रायगड जिल्ह्यासोबतच राज्यातील आदिवासींच्या मूलभूत गरजांबाबत शिमगा मोर्चाव्दारे श्रमजीवी सरकारला जाब विचारणार आहेत. या मोर्चेकरांना विवेक व विद्युल्ल्ता पंडित हे मार्गर्शन करणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तात्रेय कोळेकर, अशोक सापटे, सुरेश रेंजड, लक्ष्मण पडवळ, आदी करणार असून त्यासाठी जनजागृती व नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.(प्रतिनिधी)