शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

शहापूरचे ‘पाणी पेटले’

By admin | Updated: April 25, 2017 00:03 IST

मागील वर्षी तुलनेने अधिक पाऊस झाला असताना उन्हाळा सुरू होताच शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाणीप्रश्नाने घेरले आहे.

ठाणे : मागील वर्षी तुलनेने अधिक पाऊस झाला असताना उन्हाळा सुरू होताच शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांना पाणीप्रश्नाने घेरले आहे. तालुक्याला २५ टँकरची आवश्यकता असताना केवळ १० टँकरनेच पाणीपुरवठा होत असल्याची बाब सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या जि.प.च्या आढावा बैठकीत उघड झाली. अत्यल्प प्रमाणात उपलब्ध झालेल्या टँकरमुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आल्याचेही या वेळी निदर्शनास आले. या गढूळ पाण्याची बाटली बरोरा यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना दिली. वर्षभरात केलेल्या व अर्धवट राहिलेल्या विविध विकासकामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची पद्धत भाजपा सरकारने नुकतीच सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपताच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विकासकामांचा आढावा मंत्री, राज्यमंत्र्यांद्वारे घेतला जात आहे. त्यानुसार, ग्रामविकासमंत्री दादासाहेब भुसे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही झाडाझडती घेतली. या वेळी राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेय जलयोजनेची माहिती घेण्यात आली. आमदार पांडुरंग बरोरा यांनी शहापूर तालुक्यात मागणीपेक्षा कमी प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. तालुक्याला २५ टँकरची गरज असताना केवळ १० टँकरने तो करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. दरवर्षी शहापूर तालुक्यात मार्च महिन्यापासून खर्डी, कसारा, वाशाळा व तालुक्याच्या इतर भागांत पाणीटंचाई सुरू होते. महिनाभरापूर्वीच या टंचाई भागात पाणी टँकर सुरू करावेत, अशी मागणी करूनसुद्धा टँकर सुरू न झाल्याने तुकाराम आगिवले याचा आठ किमीवरून पाणी आणण्यासाठी गेला असता दुर्दैवी अंत झाला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडे १५ टँकरचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अत्यल्प प्रमाणात टँकरने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात टँकरने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हेच गढूळ पाणी बाटलीत भरून बरोरा यांनी या वेळी आणले होते. (प्रतिनिधी)