शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

शहापूरकरांची तहान भागणार!

By admin | Updated: February 11, 2016 01:49 IST

ठाणे जिल्हा परिषदेने शहापूर तालुक्याची टंचाईग्रस्त जिल्हा ही ओळख कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीयोजनेच्या अंतिम

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेने शहापूर तालुक्याची टंचाईग्रस्त जिल्हा ही ओळख कायमस्वरूपी पुसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित पाणीयोजनेच्या अंतिम आराखड्याचे नुकतेच सादरीकरण राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांसमोर करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नाशिकमधील भावली धरणातील पाणी आणण्यासाठी १९१.४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रस्तावित पाणीपुरवठा योजना ग्रीड स्वरूपाची असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेऊन येथील टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून गुरुत्वाकर्षणावर आधारित शहापूर नळपाणीपुरवठा ग्रीड या योजनेने आकार घेतला आहे. योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील भावली धरणात पाणी आणण्यात येणार आहे. या योजनेवर गेल्या आठ महिन्यांपासून काम सुरू होते. अखेर, त्या योजनेचे काम पूर्ण झाले असून, अंतिम आराखडा तयार झाल्यावर राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे या योजनेचे नुकतेच सादरीकरण केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. यानुसार, चार झोन तयार केले असून, पाणीपुरवठ्याचे जाळे निर्माण केले जाणार आहे.या योजनेची क्षमता प्रतिदिन ३५ दशलक्ष लीटर असणार असून, दरडोई ७० लीटर पाणी मिळणार आहे. तर, व्यापारीवापरासाठी २०१२मध्ये ४.५ दलली प्रतिदिन, तर २०१५मध्ये १२ दलली प्रतिदिन पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार आहे. (प्रतिनिधी)