शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 18:23 IST

यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.  जिल्ह्यातील सुमारे १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा आंदाज आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, यांनी सुमारे सहा कोटी ५० लाख रूपयांच्या खर्चास मंजुरीही देखील दिली आहे. त्यात शहापूरचे ७८ गावे, १९० पाड्यांना पाणी टंचाई असून त्यातील ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी ९० लाखांची तरतूद आहे. तर पाणी पुरवठ्याच्या अन्य कामांसाठी शहापूर तालुक्याला चार कोटी ११ लाखांच्या निधीची तजवीज करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलोकमतने ‘४४८ पाड्यांना पाणी टंचाई ‘ या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनास जागृत केलेत्वरीत दखल घेऊन जिल्हाप्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरूकाही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांना, याशिवाय मुंबईला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई

ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिकांना, याशिवाय मुंबईला मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आहे. सुमारे दहा गांवे ३० पाडे आदी ४० गावखेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून त्यांना १३ टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. परंतु संपूर्ण दुर्गमभाग असलेल्या या शहापूर तालुक्यातील ७८ गावे आणि १९० पाड्यांमध्ये कमी अधिकप्रमाणात पाणी टंचाई सुरू असल्याचे स्थानिकांकडून उघडकीस येत आहे.यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील काही गावपाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. या टंचाईची चाहूल लागताच लोकमतने ‘४४८ पाड्यांना पाणी टंचाई ‘ या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिध्द करून प्रशासनास जागृत केले आहे. याची त्वरीत दखल घेऊन जिल्हाप्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरू केल्याचे निदर्शनात आले. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मात्र शहापूरच्या १० मोठ्या गावांसह ३० आदिवासी पाड्यांच्या तीव्र टंचाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर वेळीच उपाययोजना म्हणून १३ टँकरव्दारे २४ तास पाणी पुरवठा सुरू आहे. शहापूरमधील अजनूप, गोलभण, दाड, जरडी, उम्रावण, कळभोंडे, विहीगांव, माळ, पाटोळ आणि घाणेपाडा या दहा मोठ्यांनासह ३० पाडे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये कोळीपाड, बिवळवाडी, नारळवाडी, पारधवाडी, आंब्याचापाडा, बोरीचापाड, पेट्याचापाडा,ओहळाचीवाडी, वरातेपाडा, कडूपाडा, भाकरेपाडा, चाफ्याचापाडा, वडपाडा, वडाचापाडा, काटीपाडा, नवीनवाडी, सावरवाडी,मेंगाळपाडा, भस्मेपाडा, चिंतामणवाडी, बोंडारपाडा, ठाकूरपाडा,जांभूळपाडा, राईचीवाडी, काळीपाडा, कुंभईवाडी, सुगाव आणि वारलीपाडा या दुर्गमभागातील गावखेडे तीव्र टंचाईला तोंड देत आहेत. त्यावरील उपाययोजना म्हणून ३० टँकर या ४० गावखे्यांना रात्रंदिवस पाणी पुरवठा करीत आहेत. काही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत. तर काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे. त्यातून महिला वर्ग पाणी काढून कुटुंबाची तहाण भागवत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यात आहे. मागील वर्षी या शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना १८ टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा मात्र ही संख्या वाढण्याचे चिन्ह दिसत आहे. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार