शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शहापूर-मुरबाड तालुक्यांत पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:31 IST

यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांतील काही गावपाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका, याशिवाय मुंबईला मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. सुमारे २८ गावांसह ५५ पाडे आदी ८३ गावखेड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून त्यांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.यंदा जिल्ह्यातील शहापूरसह मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांतील काही गावपाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. या टंचाईची चाहूल लागताच लोकमतने ४४८ पाड्यांना पाणीटंचाई, या मथळ्याखाली ५ मार्चला वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनास जागृत केले आहे. याची त्वरित दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने १६ मार्चला कोळीपाड्यासाठी पहिला टँकर सुरू केल्याचे निदर्शनात आले. भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मुरबाडच्या तीन गावे व तीन पाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर, शहापूरच्या १५ मोठ्या गावांसह ५२ आदिवासीपाड्यांच्या तीव्र टंचाईने प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर, वेळीच उपाययोजना म्हणून १६ टँकरद्वारे २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. शहापूरमधील अजनूप, गोलभण, दाड, जरडी, उम्रावण, कळभोंडे, विहिगाव, माळ, पाटोळ आणि घाणेपाडा या १० मोठ्यांसह ३० पाडे पाणीटंचाईला तोंड देत आहेत. यामध्ये कोळीपाडा, बिवळवाडी, नारळवाडी, पारधवाडी, आंब्याचापाडा, बोरीचापाड, पेट्याचापाडा,ओहळाचीवाडी, वरातेपाडा, कडूपाडा, भाकरेपाडा, चाफ्याचापाडा, वडपाडा, वडाचापाडा, काटीपाडा, नवीनवाडी, सावरवाडी, मेंगाळपाडा, भस्मेपाडा, चिंतामणवाडी, बोंडारपाडा, ठाकूरपाडा,जांभूळपाडा, राईचीवाडी, काळीपाडा, कुंभईवाडी, सुगाव आणि वारलीपाडा या दुर्गमभागातील गावखेडे तीव्र टंचाईला तोंड देत आहेत.त्यावरील उपाययोजना म्हणून ३० टँकर या ४० गावखेड्यांना रात्रंदिवस पाणीपुरवठा करत आहेत. काही ठिकाणी गावकरी टँकरवर पाणी भरत आहेत.तर, काही ठिकाणी विहिरींमध्ये टँकरचे पाणी सोडले जात आहे. त्यातून महिलावर्ग पाणी काढून कुटुंबाची तहान भागवत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यात आहे. मागील वर्षी या शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासीपाड्यांना मागील वर्षी १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा मात्र ही संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Waterपाणी