शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर, मुरबाडला ४७ टॅकरने पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: May 24, 2024 18:15 IST

यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे

ठाणे : हर घर नळ! असे म्हणत नळाव्दारे मुबलक पाणी पुरवठा हाेत असल्याचे भासवत यंदा लाेकसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधी नव्हे ते यंदा जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दुर्गम, ग्रामीण भागात सर्वाधिक म्हणजे ४७ टॅंकरने पाणी पुरवठा करून ग्रामस्थांची तहाण भागवली जात असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ठ करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे या माेठ्या महानगरांना पाणी पुरवठा करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ मात्र स्वत: तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत मात्र पाणी टंचाई अधीक तीव्र झाल्यामुळे गांवापाड्यातील रहिवाशी त्रस्त आहेत. शहापूर, मुरबाड हे तालुके तीव्र टंचाईला ताेंड देत आहेत. तब्बल २१७ गांवपाड्यांमध्याील ७३ हजार ५७७ ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा साेसाव्या लागत आहेत. गेल्या वर्ष या दाेन तालुक्यात ४४ टॅंकरने गांवपाड्यांना पाणी पुरवठा झाला हाेता. त्यात वाढ हाेऊन तब्बल ४७ टॅंकर या ग्रामस्थांना यंदा पाणी पुरवठा करीत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

शहापूर हा शहारांना पाणी पुरवठा करणारा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. गेल्या वर्षी या गांवपाड्यांना ३९ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे त्यांचा पारा ३५ ते ४० अंशाच्या खाली येत नसलयामुळे पाणी समस्या गंभीर झाली. कधी नव्हे ते यंदा शहापूरला ४२ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाळा लांबल्यास या टॅकरच्या संख्येत वाढ हाेण्याची शक्यता आहे. फुगाळे, दांड, कळभाेंडे, काेथळे, माळ, वहिगांव, उमरावणे, उंबरखांड, पेंढाळघाेळ, पपिळपाडा, पेंढरी, पळशीण, शीळ, गाेलभण, जरंडी, पगिळवाडी, राहेडवहाळ आदी ६० हजार ४९ लाेकसंख्येच्या १५१ गांवे आणि १९२ पाड्यांना ४२ टॅकरने शहापूर तालुक्यात पाणी पुरवठा सुरू आहे.

मुरबाड तालुक्यांमधील १२ माेठी गांवे आणि १३ आदिवासी पाडे आदी २५ गांवपाडे यंदा तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत. त्यांना तब्बल पाच टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी चार टॅकरेने पाणी पुरवठा करण्यात आला हाेता. मात्र यंदा टंचाईच्या गांवपाड्यांसह टॅंकरच्या संख्येत माेठी वाढ झालेली आढळून आली आहे. यंदाच्या या टंचाईच्या झळा माेहघर, ताेडली, फांगुळगव्हाण, भाेरांडे, साकुर्ली, साजई, झाडघर, फणसाेली, डेहणाेली, घागुरली, पऱ्हे, देवपेख् आदी १२ गांवे आणि १३ पाड्यांनड्तीव्र टंचाई सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात