शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

चार तालुक्यांमध्ये गंभीर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:02 IST

धोरणात्मक निर्णयाची मागणी : जलस्राेतांवर बंधारे बांधण्याची आवश्यकता

- राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा या तालुक्यांतील शेकडो गाव-पाड्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोखाडा, जव्हार या भागांत आतापासूनच टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. दरवर्षी या तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा हे तालुके डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारीनंतर या पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. मोखाडा तालुक्यात आसे गावातील दापडी एक व दोन या पाड्यांसाठी पाणी टँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केलेला आहे, तर जुने जव्हार भागातील काळीधोंड या गावासाठीही एका टँकरचा प्रस्ताव पाठवलेला आहे. फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी सुमारे ९३ गावपाड्यांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. माेखाडा तालुक्यातील देवबांध, निळमाती, आसे, शास्त्रीनगर व धामणीच्या मागे नदी व नाले यांचे चांगले पाणी स्राेत आहेत. तेथे बंधारे बांधून पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास येथील टंचाई दूर होईल, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, या तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींचा मोठा अभाव दिसत आहे. राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन  नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई