शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

चार तालुक्यांमध्ये गंभीर पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:02 IST

धोरणात्मक निर्णयाची मागणी : जलस्राेतांवर बंधारे बांधण्याची आवश्यकता

- राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा या तालुक्यांतील शेकडो गाव-पाड्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोखाडा, जव्हार या भागांत आतापासूनच टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. दरवर्षी या तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा हे तालुके डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारीनंतर या पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. मोखाडा तालुक्यात आसे गावातील दापडी एक व दोन या पाड्यांसाठी पाणी टँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केलेला आहे, तर जुने जव्हार भागातील काळीधोंड या गावासाठीही एका टँकरचा प्रस्ताव पाठवलेला आहे. फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी सुमारे ९३ गावपाड्यांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. माेखाडा तालुक्यातील देवबांध, निळमाती, आसे, शास्त्रीनगर व धामणीच्या मागे नदी व नाले यांचे चांगले पाणी स्राेत आहेत. तेथे बंधारे बांधून पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास येथील टंचाई दूर होईल, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, या तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींचा मोठा अभाव दिसत आहे. राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन  नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई