शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

पालघरमधील कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा; विहिरींनी आताच तळ गाठल्याने नागरिक चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:29 IST

विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क |मोखाडा : सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसे राहतात. येथील नागरिकांना इतर मूलभूत सुविधांची तर वानवा आहे. परंतु त्याहीपेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, यासाठी सात-आठ वर्षांत २० ते २५ लाख रुपयांचा निधी पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च केलेला असतानाही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून, गावात जायला पूल नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे. यामार्गे टँकरने ये-जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते. परंतु येथील लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, विक्रमगड : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना विक्रमगड तालुक्यातील विविध गावपाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा  येथील विहिरींनी तर आताच तळ गाठले असून या भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची मागणी केली असून तत्काळ टँकर उपलब्ध झाला तर या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. तालुक्यातील इतरही काही गावपाड्यांना येत्या दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

टॅग्स :palgharपालघरwater shortageपाणीकपात