शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमधील कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा; विहिरींनी आताच तळ गाठल्याने नागरिक चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:29 IST

विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क |मोखाडा : सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसे राहतात. येथील नागरिकांना इतर मूलभूत सुविधांची तर वानवा आहे. परंतु त्याहीपेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, यासाठी सात-आठ वर्षांत २० ते २५ लाख रुपयांचा निधी पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च केलेला असतानाही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून, गावात जायला पूल नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे. यामार्गे टँकरने ये-जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते. परंतु येथील लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, विक्रमगड : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना विक्रमगड तालुक्यातील विविध गावपाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा  येथील विहिरींनी तर आताच तळ गाठले असून या भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची मागणी केली असून तत्काळ टँकर उपलब्ध झाला तर या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. तालुक्यातील इतरही काही गावपाड्यांना येत्या दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

टॅग्स :palgharपालघरwater shortageपाणीकपात