शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

पालघरमधील कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा; विहिरींनी आताच तळ गाठल्याने नागरिक चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:29 IST

विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क |मोखाडा : सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसे राहतात. येथील नागरिकांना इतर मूलभूत सुविधांची तर वानवा आहे. परंतु त्याहीपेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, यासाठी सात-आठ वर्षांत २० ते २५ लाख रुपयांचा निधी पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च केलेला असतानाही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून, गावात जायला पूल नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे. यामार्गे टँकरने ये-जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते. परंतु येथील लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, विक्रमगड : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना विक्रमगड तालुक्यातील विविध गावपाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा  येथील विहिरींनी तर आताच तळ गाठले असून या भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची मागणी केली असून तत्काळ टँकर उपलब्ध झाला तर या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. तालुक्यातील इतरही काही गावपाड्यांना येत्या दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

टॅग्स :palgharपालघरwater shortageपाणीकपात