शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मीरा-भार्इंदर पालिकेची सात महिन्यांत फक्त ३३ टक्केच कर वसुली, ६७ टक्के वसुलीची तीव्र मोहिम सुरु करण्याचे आयुक्तांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे.

- राजू काळे 

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे. कर विभागाच्या या येरे माझ्या मागल्याच्या प्रकारामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्वरीत ६७ कर वसुलीसाठी लवकरच तीव्र मोहिम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

शहरातील एकुण मालमत्तांपैकी पालिकेत केवळ ३ लाख २८ हजार ८७८ मालमत्तांची नोंद आहे. यात २ लाख ७३ हजार ८०७ निवासी तर ५५ हजार ७१ व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तातुन मिळणाऱ्या करापोटी पालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात एकुण २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु, यात वादातित, पुर्वीच्या इमारती धोकादायक ठरल्याने त्या तोडण्यात आल्यानंतरही त्यातील रहिवाशांचा मालमत्ता कर जैसे थे असून पुर्वीच्या मालमत्ता सध्या अस्तित्वात नसल्या तरी त्यापोटी थकीत असलेली तब्बल ८६ कोटींचा कर न होणारी वसुली म्हणून समाविष्ट करण्यात  आली आहे. त्यामुळे करवसुलीचा आकडा फुगविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र १८५ कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट प्रशासनासमोर आहे. यापैकी मागील सात महिन्यांत कर विभागाने ६१ कोटी ८९ लाखांचीच म्हणजेच ३३ टक्यांचीच वसुली केल्याचे निदर्शनास आले आहे. 

गतवर्षी देखील कर विभागाने करवसुलीच्या उद्दीष्टाला हरताळ फासुन सुमारे ३० ते ३५ टक्के कर वसुली केली होती. गेल्या वर्षी प्रशासनाला नोटाबंदीचा फायदा मिळाल्याने जुन्या नोटा स्विकारण्याच्या नावाखाली पालिकेच्या उत्पन्नात भर पडली होती. यंदा मात्र कर वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रशासनाने गतवर्षी उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर निरिक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या कामासाठी जुंपले होते. सुरुवातीला त्यांना थकबाकीदारांच्या दारी केवळ त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २५ हजार रुपये  पर्यंतच्या थकीत कर वसुलीची जबाबदारी देण्यात आली. तत्पुर्वी कर विभागाने थकबाकीदारांच्या दारी बँड बडवुन वसुलीचा फंडा सुरु केला होता. त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बँडची धून विभागाला गुंडाळावी लागली. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांच्या माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील टास्क फोर्सची नियुक्ती करुन मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली. त्यात काही शाळा व भार्इंदर रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. त्यातच पालिकेत कार्यरत असलेल्या व शहरात स्वत:च्या मालकीच्या मालमत्ता असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत कर त्वरीत जमा  न केल्यास त्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरीत थकीत पालिकेत जमा करण्याचा सपाटा लावला होता. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर विभागाकडुन गांभीर्य दाखविले जात नसल्याने यंदाही उर्वरीत ६७ टक्के कर वसुलीसाठी तीव्र मोहिम या आठवड्यातच सुरु करण्याचे संकेत आयुक्तांनी लोकमतला दिले आहेत.