शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मीरा-भार्इंदर पालिकेची सात महिन्यांत फक्त ३३ टक्केच कर वसुली, ६७ टक्के वसुलीची तीव्र मोहिम सुरु करण्याचे आयुक्तांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 14:21 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे.

- राजू काळे 

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले असले तरी कर विभागाने गेल्या एप्रिलपासून अद्यापपर्यंत अवघी ३३ टक्केच कर वसुली केल्याचे समोर आले आहे. कर विभागाच्या या येरे माझ्या मागल्याच्या प्रकारामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी उर्वरीत ६७ कर वसुलीसाठी लवकरच तीव्र मोहिम सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

शहरातील एकुण मालमत्तांपैकी पालिकेत केवळ ३ लाख २८ हजार ८७८ मालमत्तांची नोंद आहे. यात २ लाख ७३ हजार ८०७ निवासी तर ५५ हजार ७१ व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तातुन मिळणाऱ्या करापोटी पालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात एकुण २७१ कोटींचे उद्दीष्ट ठेवले आहे. परंतु, यात वादातित, पुर्वीच्या इमारती धोकादायक ठरल्याने त्या तोडण्यात आल्यानंतरही त्यातील रहिवाशांचा मालमत्ता कर जैसे थे असून पुर्वीच्या मालमत्ता सध्या अस्तित्वात नसल्या तरी त्यापोटी थकीत असलेली तब्बल ८६ कोटींचा कर न होणारी वसुली म्हणून समाविष्ट करण्यात  आली आहे. त्यामुळे करवसुलीचा आकडा फुगविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र १८५ कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट प्रशासनासमोर आहे. यापैकी मागील सात महिन्यांत कर विभागाने ६१ कोटी ८९ लाखांचीच म्हणजेच ३३ टक्यांचीच वसुली केल्याचे निदर्शनास आले आहे. 

गतवर्षी देखील कर विभागाने करवसुलीच्या उद्दीष्टाला हरताळ फासुन सुमारे ३० ते ३५ टक्के कर वसुली केली होती. गेल्या वर्षी प्रशासनाला नोटाबंदीचा फायदा मिळाल्याने जुन्या नोटा स्विकारण्याच्या नावाखाली पालिकेच्या उत्पन्नात भर पडली होती. यंदा मात्र कर वसुलीचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रशासनाने गतवर्षी उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर निरिक्षकांसह सर्व अधिकाऱ्यांना कर वसुलीच्या कामासाठी जुंपले होते. सुरुवातीला त्यांना थकबाकीदारांच्या दारी केवळ त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर २५ हजार रुपये  पर्यंतच्या थकीत कर वसुलीची जबाबदारी देण्यात आली. तत्पुर्वी कर विभागाने थकबाकीदारांच्या दारी बँड बडवुन वसुलीचा फंडा सुरु केला होता. त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बँडची धून विभागाला गुंडाळावी लागली. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांच्या माध्यमातून थकबाकीदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालील टास्क फोर्सची नियुक्ती करुन मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली. त्यात काही शाळा व भार्इंदर रेल्वे स्थानकाचाही समावेश होता. त्यातच पालिकेत कार्यरत असलेल्या व शहरात स्वत:च्या मालकीच्या मालमत्ता असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत कर त्वरीत जमा  न केल्यास त्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरीत थकीत पालिकेत जमा करण्याचा सपाटा लावला होता. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर विभागाकडुन गांभीर्य दाखविले जात नसल्याने यंदाही उर्वरीत ६७ टक्के कर वसुलीसाठी तीव्र मोहिम या आठवड्यातच सुरु करण्याचे संकेत आयुक्तांनी लोकमतला दिले आहेत.