शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सरपंचाची हत्या करणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:10 IST

ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही,

कल्याण : ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही, म्हणून कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांच्यावर अ‍ॅसिड टाकत, २५ जणांच्या जमावाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना २५ सप्टेंबर १९८६ रोजी घडली होती. तब्बल ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील सात आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सरकारी जमिनीपैकी ११ एकर जमीन बाळू गायकर (रा. वासिंद) यांच्या नावे करून देण्यास नकार दिला होता. या वादातून २५ सप्टेंबर १९८६ रोजी बाळूसह २५ जणांचा जमाव हरिभाऊ यांच्या घरावर अ‍ॅसिड, काडतुसे, लाठ्याकाठ्या, तलवार आणि कुºहाडी घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी दुकानात जात असलेल्या हरिभाऊच्या पुतण्याला जमावाने शिवीगाळ केली. जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचे काका वसंत तिथे गेले असता, जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात हरिभाऊ यांच्यासह त्यांच्या घरातील १२ जण जखमी झाले होते. सरकारी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी हरिभाऊ यांना मृत घोषित केले. 

याप्रकरणी हरिभाऊ यांचे भाऊ नारायण यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार आणि पुरावे तपासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळू ऊर्फ लखा गायकर (रा. वासिंद), भाऊ दिवाणे, पांडुरंग दिवाणे, लक्ष्मण दिवाणे, एकनाथ दिवाणे, सुरेश गायकर आणि चंद्रकात गायकर (सर्व रा. गेरसे, ता. कल्याण) या सात आरोपींना जन्मठेपेसह ५० हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली.सुमारे ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली असून, आता बहुतांश आरोपींचे वय ६५ ते ७० च्या जवळपास आहे. २५ पैकी ११ आरोपींचा खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच मृत्यू झाला असून, खटल्यातील काही साक्षीदारांचादेखील मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय