शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाची हत्या करणाऱ्या सात आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:10 IST

ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही,

कल्याण : ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ११ एकर सरकारी जमीन देण्याबाबतचा ना-हरकत दाखला दिला नाही, म्हणून कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांच्यावर अ‍ॅसिड टाकत, २५ जणांच्या जमावाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना २५ सप्टेंबर १९८६ रोजी घडली होती. तब्बल ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील सात आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.कल्याण तालुक्यातील गेरसे गावचे सरपंच हरिभाऊ दिवाणे यांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सरकारी जमिनीपैकी ११ एकर जमीन बाळू गायकर (रा. वासिंद) यांच्या नावे करून देण्यास नकार दिला होता. या वादातून २५ सप्टेंबर १९८६ रोजी बाळूसह २५ जणांचा जमाव हरिभाऊ यांच्या घरावर अ‍ॅसिड, काडतुसे, लाठ्याकाठ्या, तलवार आणि कुºहाडी घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी दुकानात जात असलेल्या हरिभाऊच्या पुतण्याला जमावाने शिवीगाळ केली. जमावाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांचे काका वसंत तिथे गेले असता, जमावाने त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात हरिभाऊ यांच्यासह त्यांच्या घरातील १२ जण जखमी झाले होते. सरकारी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी हरिभाऊ यांना मृत घोषित केले. 

याप्रकरणी हरिभाऊ यांचे भाऊ नारायण यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण न्यायालयाने या प्रकरणात नऊ साक्षीदार आणि पुरावे तपासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाळू ऊर्फ लखा गायकर (रा. वासिंद), भाऊ दिवाणे, पांडुरंग दिवाणे, लक्ष्मण दिवाणे, एकनाथ दिवाणे, सुरेश गायकर आणि चंद्रकात गायकर (सर्व रा. गेरसे, ता. कल्याण) या सात आरोपींना जन्मठेपेसह ५० हजारांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली.सुमारे ३२ वर्षांनंतर या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली असून, आता बहुतांश आरोपींचे वय ६५ ते ७० च्या जवळपास आहे. २५ पैकी ११ आरोपींचा खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच मृत्यू झाला असून, खटल्यातील काही साक्षीदारांचादेखील मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय