शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

‘भिवंडीच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर तोडगा काढा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:47 IST

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली.

- रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली. या पाणी टंचाईचे पडसाद भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील, सदस्य प्रकाश भोईर यांनी गाजवला. तर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरल्याने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक बुधवारी बोलावली. या बैठकीत पाणीप्रश्न पेटला. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावपाड्यातील पाणी टंचाईचा पाढाच वाचला. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत माहिती दिली. लोनाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बापदेव पाडा येथील पाणी टंचाई संबंधी ‘खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची आली वेळ’, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाºयांच्या तोंडचे पाणी पळाले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी पाड्यास भेट दिली आणि तेथे बोरवेल मारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. स्वाती खाण यांनी दिली. तर मैदे येथील बातरेपाडा, हरेपाडा, रावते पाडा येथील पाण्याचा प्रश्न ‘लोकमत’मधील बातमीमुळे मिळाल्याचे आ. मोरे यांनी सांगितले.या बैठकीत पाणी टंचाई संबंधी ग्रामसेवकांनी माहिती दिली. त्यावर आक्र मक होत कारणे सांगू नका, गावपाड्यातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम ग्रामसेवकांचे आहे. ग्रामसेवकांनी आपले गाव समजून जर काम केले तर पाणीटंचाई निर्माणच होणार नाही, आणि टंचाईबाबत बैठका घेण्याची वेळच येणार नाही, असे सांगून पाणीपुरवठा विभागाने गावपाड्यातील टंचाईचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून पंधरा दिवसांत पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना आ. शांताराम मोरे यांनी सभेत दिले आहेत.पाणीटंचाईसह आदिवासींसह नागरिकांना भेडसावणाºया समस्या मांडून त्या दूर करण्याची मागणी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी अधिकाºयांकडे केली आहे. त्या न सोडवल्यास संघटना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. त्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. पाण्यासाठी बैठका घेण्याची वेळ येऊच नये, असे भिवंडी पंचायत समिती सभापती रवीना जाधव यांनी सांगितले. तसेच नादुरूस्त बोरवेल दुरूस्त करा, नवीन बोरवेल मारून टंचाई दूर करा असेही त्या म्हणाल्या. ‘लोकमत’मुळे आम्हाला ही टंचाईची माहिती मिळते, यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, सुदेश भास्करराव यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कवाड येथील तलावाचा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र काबाडी यांनी केली. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले. सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या बैठका घेऊन टंचाईवर मात करणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के म्हणाले.लोकमतचे मानले आभारपाणीटंचाई संबंधी दोन वर्षांपासून सातत्याने सचित्र ‘आँखो देखा हाल’ ‘लोकमत’ने जनतेसमोर आणला. यामुळे झोपी गेलेले प्रशासन जागे झाले. त्यामुळे गावपाड्यातील गरीब, कष्टकºयांना पाणी मिळते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी, सभापतींनी ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळbhiwandiभिवंडी