शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

‘भिवंडीच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर तोडगा काढा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 00:47 IST

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली.

- रोहिदास पाटीलअनगाव : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर झोपी गेलेल्या पाणीपुरवठा विभागाला जाग आली. या पाणी टंचाईचे पडसाद भिवंडी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिवसेनेचे गटनेते रविकांत पाटील, सदस्य प्रकाश भोईर यांनी गाजवला. तर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरल्याने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाºयांची तातडीची बैठक बुधवारी बोलावली. या बैठकीत पाणीप्रश्न पेटला. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावपाड्यातील पाणी टंचाईचा पाढाच वाचला. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी याबाबत माहिती दिली. लोनाड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बापदेव पाडा येथील पाणी टंचाई संबंधी ‘खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची आली वेळ’, हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाºयांच्या तोंडचे पाणी पळाले. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी पाड्यास भेट दिली आणि तेथे बोरवेल मारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. स्वाती खाण यांनी दिली. तर मैदे येथील बातरेपाडा, हरेपाडा, रावते पाडा येथील पाण्याचा प्रश्न ‘लोकमत’मधील बातमीमुळे मिळाल्याचे आ. मोरे यांनी सांगितले.या बैठकीत पाणी टंचाई संबंधी ग्रामसेवकांनी माहिती दिली. त्यावर आक्र मक होत कारणे सांगू नका, गावपाड्यातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम ग्रामसेवकांचे आहे. ग्रामसेवकांनी आपले गाव समजून जर काम केले तर पाणीटंचाई निर्माणच होणार नाही, आणि टंचाईबाबत बैठका घेण्याची वेळच येणार नाही, असे सांगून पाणीपुरवठा विभागाने गावपाड्यातील टंचाईचा आढावा घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून पंधरा दिवसांत पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना आ. शांताराम मोरे यांनी सभेत दिले आहेत.पाणीटंचाईसह आदिवासींसह नागरिकांना भेडसावणाºया समस्या मांडून त्या दूर करण्याची मागणी संघटनेचे सचिव बाळाराम भोईर यांनी अधिकाºयांकडे केली आहे. त्या न सोडवल्यास संघटना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.टंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. त्यासाठी बैठका घ्याव्या लागतात. पाण्यासाठी बैठका घेण्याची वेळ येऊच नये, असे भिवंडी पंचायत समिती सभापती रवीना जाधव यांनी सांगितले. तसेच नादुरूस्त बोरवेल दुरूस्त करा, नवीन बोरवेल मारून टंचाई दूर करा असेही त्या म्हणाल्या. ‘लोकमत’मुळे आम्हाला ही टंचाईची माहिती मिळते, यामुळे त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. पाणीपुरवठा उपअभियंता नारायण राऊत, सुदेश भास्करराव यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कवाड येथील तलावाचा गाळ काढण्यात यावा, अशी मागणी राजेंद्र काबाडी यांनी केली. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यावर कारवाईचे आश्वासन दिले. सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती सदस्यांच्या बैठका घेऊन टंचाईवर मात करणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के म्हणाले.लोकमतचे मानले आभारपाणीटंचाई संबंधी दोन वर्षांपासून सातत्याने सचित्र ‘आँखो देखा हाल’ ‘लोकमत’ने जनतेसमोर आणला. यामुळे झोपी गेलेले प्रशासन जागे झाले. त्यामुळे गावपाड्यातील गरीब, कष्टकºयांना पाणी मिळते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी, सभापतींनी ‘लोकमत’चे आभार मानले.

टॅग्स :droughtदुष्काळbhiwandiभिवंडी