शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

"अरुंद वस्तीतील आग विझवणारी यंत्रणा आधी उभारा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 00:54 IST

संतप्त नागरिकांची मागणी

भाईंदर :  मीरा- भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत तब्बल १७ कोटी खर्चून ६८ मीटरपर्यंत पोहचणारी अग्निशमन दलासाठी परदेशी वाहन खरेदी केले आहे. हे वाहन बिल्डरांना उंच इमारतीच्या परवानगी मिळाव्यात यासाठी खरेदी केल्याचा आरोप करत आधी अरुंद वस्तीत लागणाऱ्या आगी विझवण्याची यंत्रणा उभारा असा संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी महापालिका आणि सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत ६८ मीटर उंचीपर्यंत जाणारी टर्न टेबल लॅडर ही परदेशी बनावटीची अग्निशमन गाडी १७ कोटींना खरेदी केली. ही गाडी खरेदी करणारी मीरा- भाईंदर ही देशातील पहिली महापालिका असल्याचा टेंभाही मिरवण्यात आला. परंतु शहरातील गाव परिसर व अरुंद भागात आग लागल्यास ती विझवण्यासाठी मात्र महापालिकेकडे आजही यंत्रणा नसल्याने १७ कोटींची गाडी कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक करत आहेत. भाईंदरच्या उत्तन परिसरात वेलंकनी तीर्थमंदिराजवळ असलेल्या डोंगरावर नुकतीच मोठी आग लागली. परंतु ही आग विझवण्यासाठी उत्तन अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन घटनास्थळी घेऊन जाण्यास अरुंद रस्त्यांमुळे विलंब झाला.अग्निशमन दलाच्या वाहनास पोहचण्यास विलंब लागल्याने आग वेगाने पसरली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरावरील झाडे झुडपे नष्ट झाली. या ठिकाणी स्थानिकांसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरातील अरुंद ठिकाणी वसाहतीमध्येही अनेकवेळा अग्निशमन वाहने पोहचण्यास विलंब होतो जेणेकरून आगीची तीव्रता वाढून नागरिकांचे जास्त नुकसान होते. परंतु जुने मीरा- भाईंदर शहर, गावठाण, औद्योगिक वसाहती तसेच उत्तन परिसरात रस्ते अरुंद असल्याने आग लागल्यास वा आपत्ती आल्यास अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचू शकत नाही. त्यामुळे अशा अरुंद परिसरातील नागरिकांच्या बचाव व सुरक्षे साठी लहान आकाराची अग्निशमन वाहने तसेच अन्य पर्यायी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसे असताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपला मात्र बिल्डरांना अतिशय उंच इमारतींच्या परवानगी मिळावी आणि त्यांना खूष ठेवता यावे म्हणून हे वाहन खरेदी केले. परंतु गावठाण, जुन्या शहरातील अरुंद वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र लहान अग्निशमन वाहने व पर्यायी यंत्रणेसाठी खर्च करण्याची दानत मात्र नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केला आहे. नागरिकांनी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.लहान वाहनासाठी सतत मागणीउत्तन परिसरासाठी लहान आकाराची अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची पालिकेकडे सतत मागणी करूनही पालिका व सत्ताधारी यांना मात्र नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे सोयरसूतक नाही असे गंडोली यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक