शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"अरुंद वस्तीतील आग विझवणारी यंत्रणा आधी उभारा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 00:54 IST

संतप्त नागरिकांची मागणी

भाईंदर :  मीरा- भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत तब्बल १७ कोटी खर्चून ६८ मीटरपर्यंत पोहचणारी अग्निशमन दलासाठी परदेशी वाहन खरेदी केले आहे. हे वाहन बिल्डरांना उंच इमारतीच्या परवानगी मिळाव्यात यासाठी खरेदी केल्याचा आरोप करत आधी अरुंद वस्तीत लागणाऱ्या आगी विझवण्याची यंत्रणा उभारा असा संताप व्यक्त होत आहे.शुक्रवारी महापालिका आणि सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत ६८ मीटर उंचीपर्यंत जाणारी टर्न टेबल लॅडर ही परदेशी बनावटीची अग्निशमन गाडी १७ कोटींना खरेदी केली. ही गाडी खरेदी करणारी मीरा- भाईंदर ही देशातील पहिली महापालिका असल्याचा टेंभाही मिरवण्यात आला. परंतु शहरातील गाव परिसर व अरुंद भागात आग लागल्यास ती विझवण्यासाठी मात्र महापालिकेकडे आजही यंत्रणा नसल्याने १७ कोटींची गाडी कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल नागरिक करत आहेत. भाईंदरच्या उत्तन परिसरात वेलंकनी तीर्थमंदिराजवळ असलेल्या डोंगरावर नुकतीच मोठी आग लागली. परंतु ही आग विझवण्यासाठी उत्तन अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन घटनास्थळी घेऊन जाण्यास अरुंद रस्त्यांमुळे विलंब झाला.अग्निशमन दलाच्या वाहनास पोहचण्यास विलंब लागल्याने आग वेगाने पसरली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगरावरील झाडे झुडपे नष्ट झाली. या ठिकाणी स्थानिकांसह पर्यटनासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरातील अरुंद ठिकाणी वसाहतीमध्येही अनेकवेळा अग्निशमन वाहने पोहचण्यास विलंब होतो जेणेकरून आगीची तीव्रता वाढून नागरिकांचे जास्त नुकसान होते. परंतु जुने मीरा- भाईंदर शहर, गावठाण, औद्योगिक वसाहती तसेच उत्तन परिसरात रस्ते अरुंद असल्याने आग लागल्यास वा आपत्ती आल्यास अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचू शकत नाही. त्यामुळे अशा अरुंद परिसरातील नागरिकांच्या बचाव व सुरक्षे साठी लहान आकाराची अग्निशमन वाहने तसेच अन्य पर्यायी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तसे असताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपला मात्र बिल्डरांना अतिशय उंच इमारतींच्या परवानगी मिळावी आणि त्यांना खूष ठेवता यावे म्हणून हे वाहन खरेदी केले. परंतु गावठाण, जुन्या शहरातील अरुंद वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मात्र लहान अग्निशमन वाहने व पर्यायी यंत्रणेसाठी खर्च करण्याची दानत मात्र नसल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी केला आहे. नागरिकांनी कारभारावर संताप व्यक्त केला आहे.लहान वाहनासाठी सतत मागणीउत्तन परिसरासाठी लहान आकाराची अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची पालिकेकडे सतत मागणी करूनही पालिका व सत्ताधारी यांना मात्र नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे सोयरसूतक नाही असे गंडोली यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक