शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिका जाळल्याने खळबळ, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:44 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकारण आणखी तापले आहे.

कल्याण/ म्हारळ: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकारण आणखी तापले आहे.ज्या मतपेटीतील मतपत्रिका जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या, ती मतपेटी बाराव्या गणातील होती. या गणातून एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेकापचे भीमराव देऊ पाटील, तसेच शिवशाही पॅनलतर्फे दत्ता गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ही मंडळी बाजार समितीच्या आवारात होती. हा प्रकार कळताच उमेदवारांनी त्याठिकाणी धाव घेतली. या घटनेची माहिती इतरत्र पसरताच बाजार समितीच्या आवारात मोठा जमाव जमला. त्याला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.उमेदवार भीमराव देऊ पाटील यांच्या वतीने बाजार समितीचे माजी सभापती वंडार पाटील यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले. पाटील हे विजयी होणार होते. त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळेच विरोधकांकडून त्यांचा विजय रोखण्याकरिता मतपत्रिका जाळण्याचा घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला. या गणातील मतपेटीतील मतपत्रिका जाळण्यात आल्याने या गणाची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.हा प्रकार कळताच आमदार गणपत गायकवाड यांनी त्याठिकाणी धाव घेतली. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, या गणातून आमच्या उमेदवाराला ७० टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे आम्हाला पराभवाची भीती नाही. मात्र, हा प्रकार निवडणुकीस काळिमा फासणारा आहे. मतपेटी सीलबंद करताना उमेदवारांना त्याठिकाणी सोडले नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस मतपत्रिका जळण्याच्या घटनेस कारणीभूत आहेत. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आ. गायकवाड यांनी केली.बाजार समितीचे प्रशासक शहाजी पाटील यांच्याकडे याविषयी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, २९ मतदान केंद्रांपैकी २८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, बाराव्या गणातील मतपेटी बाजार समितीच्या स्ट्राँगरूममध्ये नेत असताना मतपेटीतून धूर येत असल्याचे दिसून आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मतपेटी उघडली. त्यात मतपत्रिका जळत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार कसा घडला, हे प्रथमदर्शनी सांगता येत नाही. मात्र, बाजार समितीच्या निवडणूक कायद्यान्वये या घटनेची पूर्ण कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असून, राज्य निवडणूक आयोगासही कळवले असल्याचे पाटील यांनी सांगितले.संबंधित वृत्त/ पान २चार तरुण ताब्यातमतपत्रिका जाळल्याचा प्रकार उघडकीस आला, तेव्हा बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेतून एक लाल रंगाची गाडी सुसाट वेगाने गेली. ती पाहून पोलिसांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीतील चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर मतपेट्या सील करण्यात आल्या. मतपेटी सील करण्यासाठी गरम लाखेचा वापर केला जातो. ही गरम लाख आतमध्ये सांडून मतपत्रिका जळल्या असाव्यात, असा अंदाज निवडणूक प्रक्रियेत सहभागी सूत्रांनी व्यक्त केला.

टॅग्स :Electionनिवडणूकkalyanकल्याण