शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

भाजपाच्या सिंधी मतांवर सेनेचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:02 AM

डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतांची बेगमी आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तीन विधानसभा मतदारसंघांची तयारीच शिवसेनेने यानिमित्ताने सुरू केल्याचे मानले जाते.उल्हासनगरात तब्बल साडे चारलाख मतदार आहेत. यातील अर्धेअधिक मतदार सिंधी भाषक असून लोकसभा आणि तीन विधानसभांसाठी ते निर्णायक ठरणारे आहेत. शहरातील कॅम्प नं- १, २ आणि ३ तसेच म्हारळ, कांबा, वरप या गावांचा समावेश उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात होतो. कॅम्प नंबर ४ व ५ परिसरातील एक लाख ४० हजार मतदार अंबरनाथ विधानसभा; तर कॅम्प नंबर ४ परिसरातील ४० हजार मतदार कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात मोडतात. त्यामुळेच कल्याण लोकसभा आणि तीन विधानसभेतील सिंधी मतदार डोळ््यासमोर ठेवून शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.सध्या भाजपात आयलानी विरूद्ध कलानी असा संघर्ष तापला आहे. त्यातही निर्णायक ठरणारा साई पक्ष संभ्रमावस्थेत असला, तरी शांत आहे. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७० टक्के मतदार सिंधी भाषिक आहेत. शिवसेनेने सिंधी समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्यास सिंधी, मराठी आणि इतर मतदार एकत्र यतील, अशी शिवसेनेची गणिते आहेत.उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने सिंधी भाषक उमेदवार दिल्यास त्याचा फायदा अंबरनाथ आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघांना होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी गृहित धरल्याची चर्चा आहे.पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणातील बांधकामांबाबत तात्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. यातूनच अवैध बांधकामांना पाठीशी घालण्याचा आरोप ठेवत तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द का करून नये? अशी नोटीस बजावली होती. भाजपापेक्षा शिवसेना सिंधी व्यापाºयांच्या मदतीला धावून आली, असा त्याचा परिणाम झाला आणि सिंधी व्यापाºयांशी शिवसेनेचे नाते जोडले गेले. त्यातही ठाकरे यांच्या सभेत सिंधी संतांचा सत्कार करून शिवसेनेने धार्मिकदृष्ट्या सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला.।भांडणामुळे नाराजीकलानी-आयलानी या दोन कुटुंबातील लढतीत सिंधी समाज दोन गटात विभागला गेला. दोघांच्या भांडणात शहराचा विकास ठप्प झाला असून सिंधी समाजातही स्थलांतराचे प्रमाण वाढले, अशा प्रकारची माहिती समोर येऊ लागली. त्याचा फायदा शिवसेनेने उचलला. आयलानी आणि कलानी नको, असे म्हणणाºयांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना