शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १३० रुपये बिलासाठी कापले ज्येष्ठ नागरिकाचे वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : अवघे १३० रुपये वीज बिल भरले नाही म्हणून एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचे वीज कनेक्शन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : अवघे १३० रुपये वीज बिल भरले नाही म्हणून एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचे वीज कनेक्शन तोडून महावितरणने त्यांचे मीटरदेखील जप्त केले. ज्यांची लाखो, हजारोंची थकबाकी आहे त्यांना अशी वागणूक दिली जाते का, असा सवाल अन्य रहिवाशांकडून केला जात आहे.

मोहन राव, असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून, एमआयडीसी निवासी परिसरामधील स्टर्लिंग पॅलेस आरएच३/१ या सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून ते राहत आहेत. कोरोनामुळे ते दापत्य बहुतेक वेळा आपल्या गावी असते. अधूनमधून ते डोंबिवलीतील घरी येतात.

जुलै महिन्यात त्यांना आलेले १३० रुपयांचे बिल त्यांना गावी असल्याने भरता आले नाही. गेल्या वर्षापासून ते महावितरणकडे वीज बिलापोटी आगाऊ रक्कम भरीत होते. त्यामुळे त्यांचे बिल उणे झीरो येत असे; परंतु यावेळी त्यांना बिलाची आगाऊ रक्कम गावी असल्याने भरता आली नाही. ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा डोंबिवलीतील आपल्या घरी आले तेव्हा घरातील दिवे लागत नसल्याने त्यांची वीज जोडणी कापल्याचे लक्षात आले. त्यांचे वीज मीटरही महावितरणचे कर्मचारी घेऊन गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी याबाबत महावितरण, एमआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना ऑगस्ट महिन्याचे व मागील महिन्याचे असे मिळून २४० रुपये बिल आणि रीकनेक्शन चार्जेस असे एकूण ३५४ रुपये भरा, असे सांगण्यात आले. त्यांनी दिनांक १२ ऑगस्ट रोजी ऑनलाइन ही रक्कम भरली. आजपर्यंत त्यांची वीज जोडणी पूर्ववत केली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.

महावितरणकडे काही जणांची लाखो रुपयांची थकबाकी असताना केवळ १३० रुपये बिल बाकी असताना एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला मानसिक त्रास का सहन करावा लागत आहे. महावितरणकडून एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा तासन्तास खंडित होण्याचे प्रकार होत असून, त्यात सुधारणा करण्याऐवजी प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना त्रास दिल्याबद्दल नागरिकांत मोठा रोष आहे. ते दाम्पत्य पैसे भरूनही वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने त्रासाला कंटाळून पुन्हा आता आपल्या मूळ गावी माघारी गेले. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर सांगा, असे या दाम्पत्याने शेजाऱ्यांना सांगितल्याने त्यांनीही महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून मोहन राव यांचा वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली; परंतु तो अद्यापही सुरू झालेला नाही.

------------------