शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नोकरीचे आमिष दाखवून ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाची सव्वा लाखाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:06 IST

निवृत्तीनंतर वेळ चांगला जाईल आणि अर्थार्जनही होईल, या हेतूने ते नोकरीच्या शोधात असलेल्या संजीव देशपांडे (५८) यांच्याकडून दोघा भामटयांनी एक लाख १६ हजार ८५० रुपयांची रक्कम उकळली.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतर नोकरीसाठी प्रयत्न आॅनलाईन पैसे भरण्यास सांगितलेराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : नोकरीचे आमिष दाखवून संजीव देशपांडे (५८) या वृंदावन सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाकडून मनीष आणि संजय सिंघानिया यांनी एक लाख १६ हजार ८५० रुपये उकळल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी घडला. वारंवार पाठपुरावा करूनही नोकरी किंवा पैसे न मिळाल्याने देशपांडे यांनी अखेर याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.देशपांडे हे अलीकडेच नोकरीवरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर वेळ चांगला जाईल आणि अर्थार्जनही होईल, या हेतूने ते नोकरीच्या शोधात होते. त्यांनी आॅनलाइनही नोकरीसाठी प्रयत्न केला होता. हीच माहिती मिळाल्यानंतर मनीष आणि संजय सिंघानिया यांनी ८ जून २०१७ रोजी त्यांना फोन करून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार, एका संकेतस्थळावर जाऊन त्यांना अर्ज भरण्यास या दोघांनी भाग पाडले. त्यानंतर, नोकरीसाठी एक लाख १६ हजार ८५० रुपयांची मागणी करून ती रक्कम त्यांना एका बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. पुढे नोकरीसाठी देशपांडे यांनी संबंधित फोनवर पाठपुरावा केला. मात्र, सुरुवातीला प्रतिसाद देणाऱ्या या भामट्यांनी नंतर त्यांचे फोनही घेतले नाही. कालांतराने तो फोनही बंद पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशपांडे यांनी राबोडी पोलीस ठाण्यात १३ आॅगस्ट २०१८ रोजी माहिती तंत्रज्ञान ६६-ड अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘‘कोणीही नोकरी लावण्यासाठी पैसे घेत नाही. पैसे घेऊन नोकºया दिल्या जात नसतात. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण खात्री करूनच अशा व्यक्तींशी संवाद साधावा. पण, अशा अनोळखींना कोणीही पैसे देऊ नये.’’रामराव सोमवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राबोडी

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाfraudधोकेबाजी