शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा रब्बी हंगामासाठी पाेषक; हरभरा, वाल, चवळीच्या उत्पादनाची लगबग!

By सुरेश लोखंडे | Updated: October 31, 2023 18:11 IST

हवेतील गारवा सकाळच्या वेळी वाढला आहे. त्यावर रब्बी हंगाम घेण्यासाठी बळीराजा सरसावला, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले

ठाणे : राज्याच्या अन्य जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यांमध्ये दुष्कळी स्थिती दिसून येत आहे. या तुलनेत ठाणे जिल्ह्यात १०९.७ टक्के म्हणजे २६७०.१ िममी उत्तम पाउस पडला आहे. त्यामुळे सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. हवेतील वाढता गारवा लक्षात घेउन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाच्या लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. सर्वा धिक रब्बी हरभऱ्याच्या पिकासह वाल, चवळी, मुग आदी रब्बी पिके पाच हजार ७५० हेक्टरवर घेण्यासाठी शेतीची तयारह पूर्ण झाली आहे.

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात भात हे एकमेव खरीपाचे पीक आहे. यानंतर मात्र रब्बीच्या पिकासाठी शेतकरी पूर्ण तयारीनिशी शेताच्या बांधावर दिसून येताे. त्यामध्ये हवेतील गारव्यावर येणाऱ्या हरभरा, वाल, मुग, चवळी, उडीद आदी कडधान्याच्या उत्पादनासाठी आता तत्पर झाला आहे. त्यासाठी पाच हजार ७५० हेक्टरवर या कडधान्याची लागवड हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले सध्या वाहत आहे. धरणांमध्ये १०० टक्के पाणी झालेला आहे. पहाटेच्या वेळी जिल्ह्यातील माळरानावर, घाट परिसरात धुक्याचे सम्राज्य दिसून येत आहे. रब्बी पिकासाठी उत्तम हवामना असल्यामुळे गेल्या वषार्च्या तुलनेत यंदा तब्बल पाच हजार ७५० हेक्टरवर रब्बी हंगाम घेतला जात आहे. गेल्या वर्षी अवघ्या पाच हजार १०५ हेक्टरवर हा हंगाम घेतला हाेता.

त्यामुळे हवेतील गारवा सकाळच्या वेळी वाढला आहे. त्यावर रब्बी हंगाम घेण्यासाठी बळीराजा सरसावला, असे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले. या रब्बी हंगामात हरभरा माेठ्याप्रमाणात घेतला जात आहे. हेक्टरी ६७४ क्विंटल हरभऱ्याची उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. त्यास अनुसरून तीन हजार ४३२ हेक्टरवर शेतकऱ्यांकडून हरभरा पेरण्यात आलेला आहे. या पाठाेपाठ वालाच्या उत्पादनाकडे त्यांचे अधिक लक्ष असल्यामुळे यंदा तब्बल एक हजार १२ हेक्टरवर वाल लावून त्यांचे हेक्टरी ६०५ क्विंटल उत्पादकता घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. चवळीचे पीक ७१५ हेक्टरवर घेतले जात आहे. त्याची उत्पादकता हेक्टरी ६४९ क्विंटल निश्चित केली आहे. मुग यंदा २२० हेक्टरवर घेतला जात आहे. ६८२ क्विंटल उत्पादकता नश्चित झाली आहे. उडीद २०१ हेक्टरवर घेतला जात असून ३१९ क्विंटल उत्पादकता सध्याच्या हवामनाला अनुसरून निश्चत केली आहे. रब्बी मका या पिकाचे उत्पादन ११३ हेक्टरवर घेतले जात असून तीळ ५७ हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे नियाेजन शेतकऱ्यांनी करून त्याप्रमाणे कामाला प्रारंभही करण्यात आलेला आहे.