शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवण्याचे ठाणे जि. प.सीईओंचे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 18:01 IST

सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून  नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व  शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून  शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.  

ठाणे - जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागाच्या शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांच्या भात पिकांचे करपा व कडाकरपा या रोगाने नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) रुपाली सातपुते, यांनी कुंडनपाडा, उंबरमाळी, अजनुप गावातील शिवारात जाऊन या भात शेतीच्या नुकसानीची पाहाणी केली. या नुकसान चा तत्काळ पंचनामे करुन तो अहवाल पाठवण्याचे आदेश ही त्यांनी कृषी खात्यास दिले आहे.  

यंदा  या दुर्गम भागातील भात शेतीचे करपा व कडाकरपा रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची  दखल घेत सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून  नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व  शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून  शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.  काही दिवसांपूर्वी कृषि तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीची टीम प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांचे अंदाजे ३.१५ हेक्टर क्षेत्रावर किडरोग झाल्याचे आढळून आले.  यावेळी समितीने कीड का लागली याचा अहवाल  देत  उपायोजना सुचविल्या आहेत. याशिवाय या रोगाची गाभीर्याने दखल घेत या समितीही काही दिवस आधी या गावांना भेटी देऊन रोखाचे कारण शोधल्याचा विषय या सीईओंच्या चर्चे दरम्यान उघड झाला आहे. शेतात पाणी साठल्या मुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे करपा व कडाकरपा रोगाचा या  भात शेतीवर प्रादुर्भाव झाल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. या पाहाणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, पंचायत समिती सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच  सचिन निचिते, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, कृषि अधिकारी विलास घुले आदी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने रोग शेतकऱ्यांनी जयश्रीराम, जोरदार, रुपम, दप्तरी -१००८ , शबरी, वायएसआर व स्थानिक सुधारीत वाणाच्या भाताची लागवड केल्याचे निदर्शनात आले. त्यावर औषधी फवारणी केली. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगाची तीव्रता कमी न झाल्याचे शेतकऱ्यांनी उघड केले आहे.

टॅग्स :thaneठाणे