शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

निवडणूक अ‍ॅपवरही सेल्फींचा भडीमार; ‘सी-व्हिजील’वरील ८६ तक्रारी कराव्या लागल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 00:07 IST

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे.

ठाणे : निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यापासून या अ‍ॅपवर आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या तक्रारींपेक्षा अनेकांनी सेल्फी शेअर केल्याने निवडणूक विभाग बुचकळ्यात पडला आहे. काहींनी चक्क वैयक्तिक तक्रारींचा सूर या अ‍ॅपवर लावला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये या अ‍ॅपविषयी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लघंन होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावले उचलण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळात बेकायदा पोस्टर, बॅनर लावले किंवा आचारसंहिता भंग होत असल्याचे एखादे प्रकरण असेल, तर प्रत्येक नागरिकाला तत्काळ तक्रार करता यावी, या उद्देशाने ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर आतापर्यंत १३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील केवळ ४७ तक्रारी या ग्राह्यधरण्यात आल्या आहेत. उर्वरित ८६ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत.१५ जणांनी चक्क आपले सेल्फी काढून ते या अ‍ॅपवर पाठवले आहेत. काहींनी एखाद्या बॅनरपुढे उभे राहून सेल्फी काढले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. काहींनी केवळ अंधारातील रस्त्यांची छायाचित्रे पाठवली आहेत. ज्यांचा आचारसंहिता भंगाशी काहीही संबंध नाही. अशा बिनबुडाच्या तक्रारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशी करावी तक्रार...एखादे पोस्टर, बॅनर किंवा एखाद्याकडून आचारसंहिता भंग होत असल्यास त्याचे छायाचित्र काढून या अ‍ॅपवर पाठवायचे आहे. छायाचित्र धाडताना ते नेमके कोणत्या भागातील आहे, याचा उल्लेख करण्यात यावा, हे अभिप्रेत आहे. तसेच आचारसंहिता भंगाचा तपशील कमीतकमी शब्दांत लिहून अ‍ॅपवर पाठवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.100मिनिटांत तक्रारीवर होते कारवाईया अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर ही तक्रार ज्या भागातून आली आहे, त्या भागातील निवडणूक विभागातील पथकाद्वारे फ्लाइंग स्क्वॉडकडे पाठवली जाते. त्यानंतर, पुढील १५ मिनिटांत फ्लाइंग स्क्वॉड घटनास्थळी धाव घेते. त्यानंतर, त्यावर योग्य ती कारवाई झाल्यावर त्याची इत्थंभूत माहिती ही ४५ मिनिटांमध्ये मुख्य निवडणूक विभागाला दिली जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे