शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत २६४३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:29 IST

२७ जूनपर्यंत प्रवेश घ्या; पालकांना सूचना

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दुर्बल घटकातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठीची दुसरी शनिवारी आॅनलाइन यादी जाहीर केली आहे. या यादीत २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ जून ते २७ जूनपर्यंत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील कायम विना अनुदानित सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळांशी संलग्न शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाखा वगळून) आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१८- २०१९ या शैक्षणिकवर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रि या आॅनलाईन करण्याचे प्रस्तावित केले असून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेदेखील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यातील शाळांनी आॅनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीदेखील आॅनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले होते.मुदतीत अर्ज न केल्यास फेरविचार नाहीपहिल्या फेरीत ५ हजार ८९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. आता १५ जून रोजी दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गासाठी १ हजार ९८८ तर, प्रि-प्रायमरीसाठी ६५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याचा पुढील फेरीत विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.पालकांनी हे करावेअर्जदारांनी मोबाइलवर संदेश आला नसेल, त्यांनी स्वत:च्या लॉगिनमधील अ‍ॅडमिट कार्ड या आॅपशनमध्ये जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जातांना सर्व ओरीजनल कागदपत्रे सोबत घेवून जावे. शाळा प्रवेशासंबंधीत काही तक्र ारी असल्यास याच काळात संबंधीत तालुका व जिल्हा परिषद ठाणे येथे शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन शिक्षण विभगाने करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीनंतर तक्र ार घेवून आल्यास त्याचा विचार करण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा