शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शिक्षक दिन : मोठे स्वप्न पाहण्याचे बीज शिक्षकांनीच मनात पेरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:01 IST

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांना वडिलांचे प्रोत्साहन तर शिक्षकांचे मिळाले मार्गदर्शन

ठाणे : कुंभार जसे मडके घडवतो, तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. आयुष्यात आईवडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. माझ्याही आयुष्यात मायबापानंतर शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. माझे गाव जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील काळखेडा. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शेणामातीने सारवलेल्या भिंती, वर्गखोल्यांतील जमीन, एकाच खोलीत बसवलेले चार वर्ग अशी माझी शाळा होती. पण, याच शाळेने आणि शाळेतील शिक्षकांनी मला घडवलं, मोठे स्वप्न पाहण्याचे बीज मनात पेरले आणि त्यामुळे आज मी भारतीय प्रशासकीय सेवेत रु जू झालो.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पाचवी ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद, वाघारी येथे दररोज दोन किमी पायी जाऊन केले. तर, त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी पारोळ्याला गेलो. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिलो. यातून वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाली. मला काळखेडाच्या शाळेत लाभलेले दौलतगुरुजी, गोसावीगुरुजी आणि बोंबलेगुरु जी या तिन्ही शिक्षकांनी माझ्या आयुष्याला समृद्ध बनवलं. त्यांनी दिलेली शिकवण, केलेले संस्कार आणि प्रसंगी केलेली शिक्षा यातून वेळोवेळी चूक-बरोबर समजत गेले.गुरूजी प्रसंगी ओरडायचे, पण प्रेमाने समजवायचेही...तेव्हाचे शिक्षक गावातच राहत असत, त्यामुळे जरी शाळा सकाळच्या सत्रात ठरावीक तासांची भरत असली, तरी शिक्षकांचा सहवास हा पूर्णवेळ मिळत होता. त्यामुळे शिक्षकांशी कौटुंबिक नातेसंबंध तयार झालेले असायचे. अनेकदा गुरूजी ओरडायचे, प्रसंगी कठोर वागायचे, पण त्यांच्या रागावण्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दडलेला असायचा. तेव्हा, शिक्षकांविषयी आम्हाला आदरयुक्त भीती असे.त्यावेळी गणित, इंग्रजीसारखे विषय जरी सामान्य मुलांना कठीण जात असले, तरी या तिन्ही शिक्षकांमुळे मला मात्र गणित आणि भाषा विषयाची गोडी निर्माण झाली. पायाभूत शिक्षणाचा भक्कम पाया प्राथमिक शिक्षणामुळे तयार होतो, हे मला आजही पदोपदी जाणवत राहते. त्यामुळे या तिन्ही शिक्षकांची आठवण जरूर येते. भावी पिढी संस्कारित करून निकोप समाजनिर्मिती करण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षकांचे स्थान सर्वांच्याच आयुष्यात अनन्यसाधारण असते.ताईच्या वर्गात बसल्याची मला आजही आठवण...आज माझ्या शाळेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेणामातीची शाळा आज सिमेंट काँक्रिटने उभी राहिली आहे. भौतिक सुखसुविधेने सज्ज आहे. गावाला जेव्हा कधी जाणं होत,ं तेव्हा आपोआप शाळेकडे पावलं वळतात. शिक्षकांशी गप्पा होतात. प्रसंगी मुलांशी संवाद साधतो आणि पुन्हा मला माझे शाळेचे सोनेरी दिवस आठवू लागतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या मोठ्या ताईच्या वर्गात बसलो होतो, त्याची मला आजही आठवण होते.शिक्षकांमुळेच पाया भक्कम होत गेला...

टॅग्स :thaneठाणेTeachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षक