शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

शिक्षक दिन : मोठे स्वप्न पाहण्याचे बीज शिक्षकांनीच मनात पेरले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:01 IST

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांना वडिलांचे प्रोत्साहन तर शिक्षकांचे मिळाले मार्गदर्शन

ठाणे : कुंभार जसे मडके घडवतो, तसे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. आयुष्यात आईवडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते. माझ्याही आयुष्यात मायबापानंतर शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. माझे गाव जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील काळखेडा. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माझे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. शेणामातीने सारवलेल्या भिंती, वर्गखोल्यांतील जमीन, एकाच खोलीत बसवलेले चार वर्ग अशी माझी शाळा होती. पण, याच शाळेने आणि शाळेतील शिक्षकांनी मला घडवलं, मोठे स्वप्न पाहण्याचे बीज मनात पेरले आणि त्यामुळे आज मी भारतीय प्रशासकीय सेवेत रु जू झालो.प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पाचवी ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद, वाघारी येथे दररोज दोन किमी पायी जाऊन केले. तर, त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी पारोळ्याला गेलो. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिलो. यातून वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाली. मला काळखेडाच्या शाळेत लाभलेले दौलतगुरुजी, गोसावीगुरुजी आणि बोंबलेगुरु जी या तिन्ही शिक्षकांनी माझ्या आयुष्याला समृद्ध बनवलं. त्यांनी दिलेली शिकवण, केलेले संस्कार आणि प्रसंगी केलेली शिक्षा यातून वेळोवेळी चूक-बरोबर समजत गेले.गुरूजी प्रसंगी ओरडायचे, पण प्रेमाने समजवायचेही...तेव्हाचे शिक्षक गावातच राहत असत, त्यामुळे जरी शाळा सकाळच्या सत्रात ठरावीक तासांची भरत असली, तरी शिक्षकांचा सहवास हा पूर्णवेळ मिळत होता. त्यामुळे शिक्षकांशी कौटुंबिक नातेसंबंध तयार झालेले असायचे. अनेकदा गुरूजी ओरडायचे, प्रसंगी कठोर वागायचे, पण त्यांच्या रागावण्यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दडलेला असायचा. तेव्हा, शिक्षकांविषयी आम्हाला आदरयुक्त भीती असे.त्यावेळी गणित, इंग्रजीसारखे विषय जरी सामान्य मुलांना कठीण जात असले, तरी या तिन्ही शिक्षकांमुळे मला मात्र गणित आणि भाषा विषयाची गोडी निर्माण झाली. पायाभूत शिक्षणाचा भक्कम पाया प्राथमिक शिक्षणामुळे तयार होतो, हे मला आजही पदोपदी जाणवत राहते. त्यामुळे या तिन्ही शिक्षकांची आठवण जरूर येते. भावी पिढी संस्कारित करून निकोप समाजनिर्मिती करण्यात शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षकांचे स्थान सर्वांच्याच आयुष्यात अनन्यसाधारण असते.ताईच्या वर्गात बसल्याची मला आजही आठवण...आज माझ्या शाळेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेणामातीची शाळा आज सिमेंट काँक्रिटने उभी राहिली आहे. भौतिक सुखसुविधेने सज्ज आहे. गावाला जेव्हा कधी जाणं होत,ं तेव्हा आपोआप शाळेकडे पावलं वळतात. शिक्षकांशी गप्पा होतात. प्रसंगी मुलांशी संवाद साधतो आणि पुन्हा मला माझे शाळेचे सोनेरी दिवस आठवू लागतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या मोठ्या ताईच्या वर्गात बसलो होतो, त्याची मला आजही आठवण होते.शिक्षकांमुळेच पाया भक्कम होत गेला...

टॅग्स :thaneठाणेTeachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षक