शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मे च्या दुसऱ्या आठवड्यात उल्हासनगरात सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:52 IST

उल्हासनगरमधील पुढच्या टर्मचे महापौरपद शिवसेनेला हवे असून स्थायी समितीतही सभापतीपदासह वाटा हवा आहे.

उल्हासनगर : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाच्या १३ मे रोजी होणाºया निवडणुकीत भाजपाने हक्क सोडला आणि शिवसेनेला ते पद दिले, तर लागलीच उल्हासनगरमध्ये सत्तांतर होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उल्हासनगरमधील पुढच्या टर्मचे महापौरपद शिवसेनेला हवे असून स्थायी समितीतही सभापतीपदासह वाटा हवा आहे. त्यामुळे सध्याच्या स्थायी समितीतील काही सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच सत्तापालटानंतरच्या पदे वाटणीचा फॉर्म्युला ठरवण्याचे काम वेगात सुरू आहे.उल्हासनगरचा विकास साधण्यासाठी भाजपा-शिवसेनेची नैसर्गिक युती हवी होती, असी खंत भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी व्यक्त करत साई पक्षाला सोबत घेण्यात चूक झाल्याचेच अप्रत्यक्षरित्या कबूल केले. ओमी कलानी यांचे महत्त्वाकांक्षी राजकारण पाहता त्यांनाही निवडणूक सोबत घेणे योग्य नसल्याची जाणीव भाजपा नेत्यांना झाली आहे.सध्या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात उल्हासनगरच्या सत्तेबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीत जेवढा त्याग भाजपा करेल, तेवढा त्याग उल्हासनगरमध्ये शिवसेनेला करावा लागणार आहे. भाजपाचे आमदारकीचे उमेदवार कुमार आयलानी यांना आपल्या पत्नीचे अडीच वर्षांचे महापौरपद पूर्ण व्हावे, असे वाटते; तर ओमी कलानी यांची टीम अजूनही जूनमध्ये आपल्याला महापौरपद मिळेल या आशेवर असल्याचे दिसते. येत्या पंधरवड्यात सारे चित्र स्पष्ट होईल आणि कल्याण-डोंबिवलीची महापौरपदाची निवडणूक पार पडल्यावर उल्हासनगरमध्ये सत्तांतर होईल, असे सध्याच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले.फुटीची शक्यता मावळलीभाजपाच्या ३३ सदस्यांपैकी साधारण १३ जणांचा ओमी कलानी यांची गट फुटून बाहेर पडेल, असे त्या गटातर्फे सांगितले जात होते. मात्र भाजपासोबत राहिल्यास सत्तेतील काही पदे मिळू शकतात, याचे भान आल्याने ते नगरसेवक भाजपाविरोधात असले तरी फुटून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे ओमी यांची पुरती कोंडी झाली आहे. भाजपातून फुटून बाहेर पडणाºया ओमी यांच्या गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू, असे सांगणाºया शिवेसनेने आता पवित्रा बदलला असून ओमी टीमचे नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांच्यासोबत युतीची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रियाही शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी दिली.शिवसेनेला बरोबरीने वाटा हवा : उल्हासनगरच्या सत्तेत सदस्यसंख्येनुसार वाटा मिळावा, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. सध्याचे महापौरपद सलग भाजपाकडे राहिले, तर नंतरचे महापौरपद मिळावे; स्थायी समितीत सदस्यत्व, प्रसंगी सभापतीपद, अन्य समित्यांवर वर्णी अशा मागण्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे मांडल्या आहेत. नगरसेवकांच्या संख्येनुसार सत्तेचा वाटा लागेल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.ओमी समर्थकही गटबदलूभाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी निवडणुकीच्या अखेरपर्यंत ओमी टीमच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. मात्र पक्षातील एका गटाच्या आग्रहामुळे तो गट महाआघाडीत समाविष्ट झाला. पण त्या टीमच्या सदस्यांना भाजपाच्या चिन्हावर रिंगणात उतरविल्याने सध्या भाजपा निश्चिंत आहे. आजवर ओमी कलानी समर्थक म्हणून मानला गेलेला भाजपा नेत्यांचा गटही या घडामोडींत आयलानी यांना जाऊन मिळाल्याने आयलानींचा एकमेव गट अस्तित्त्वात उरला आहे.साई पक्ष ना घर का ना घाट काभाजपा आणि ओमी टीमच्या राजकीय संघर्षात साई पक्षाचा बळी गेला आहे. गेली दहा वर्षे किंगमेकर म्हणून वावरणाºया या पक्षाचे महत्त्व अचानक संपुष्टात आले आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येत असल्याने सध्या साई पक्षाकडे असलेले उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. साई पक्षाने ती पदे सहजपणे न सोडल्यास स्थायी समितीतल काही सदस्यांना राजीनामे द्यायला लावून भाजपा-शिवसेना तेथील सत्ता समीकरणे बदलू शकते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना