शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:06 IST

नागरिकांचा निष्काळजीपणा : १९ दिवसांत आढळले नऊ हजार २८६ नवे रुग्ण

प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसाला ५०० हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सप्टेंबर महिन्यातील या १९ दिवसांमध्ये तब्बल नऊ हजार २८६ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे.केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. १४ मार्च ते ८ जून या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. आजच्याघडीला ही संख्या शनिवापर्यंत तब्बल ३८ हजार ३०१ पर्यंत पोहोचली असून यातील ७६२ जण मृत पावले. ३२ हजार ८८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असले तरी सप्टेंबरमध्ये रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० हून अधिक आहे. सुरुवातीला रोज दोन ते चार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. परंतु, अनलॉकनंतर रोज सरासरी ९ ते ११ दरम्यान मृत्यू होत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मृत पावणाºया रुग्णांची संख्या पाच ते सहावर आली आहे. मार्चपासून आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण जुलै महिन्यात आढळले. १ ते ३१ जुलैदरम्यान १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये रुग्ण आढळले याचा विचार करता जुलै महिन्यातील संख्या ओलांडण्याची दाट शक्यता आहे.तरुणांकडून नियमांचे उल्लंघनवाढते कोरोनाचे रुग्ण पाहता हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात सद्य:स्थितीला ४४ हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना येजा करण्यास बंदी असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केडीएमसीकडून सुरू आहे. परंतु, तरुणांकडून उल्लंघन होत आहे.ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, ते पाहता कोरोनाच्या दुसºया लाटेला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. या एकूणच परिस्थितीला नागरिकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. राज्य सरकार असो अथवा स्थानिक प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, अनलॉकमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नाही.- डॉ. प्रशांत पाटील, सचिव, कल्याण आयएमए

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस