शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीएमसी’त कोरोनाची दुसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:06 IST

नागरिकांचा निष्काळजीपणा : १९ दिवसांत आढळले नऊ हजार २८६ नवे रुग्ण

प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसाला ५०० हून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सप्टेंबर महिन्यातील या १९ दिवसांमध्ये तब्बल नऊ हजार २८६ जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे.केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. १४ मार्च ते ८ जून या लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहे. आजच्याघडीला ही संख्या शनिवापर्यंत तब्बल ३८ हजार ३०१ पर्यंत पोहोचली असून यातील ७६२ जण मृत पावले. ३२ हजार ८८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले असले तरी सप्टेंबरमध्ये रोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ५०० हून अधिक आहे. सुरुवातीला रोज दोन ते चार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. परंतु, अनलॉकनंतर रोज सरासरी ९ ते ११ दरम्यान मृत्यू होत होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मृत पावणाºया रुग्णांची संख्या पाच ते सहावर आली आहे. मार्चपासून आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण जुलै महिन्यात आढळले. १ ते ३१ जुलैदरम्यान १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये रुग्ण आढळले याचा विचार करता जुलै महिन्यातील संख्या ओलांडण्याची दाट शक्यता आहे.तरुणांकडून नियमांचे उल्लंघनवाढते कोरोनाचे रुग्ण पाहता हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी क्षेत्रात सद्य:स्थितीला ४४ हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना येजा करण्यास बंदी असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केडीएमसीकडून सुरू आहे. परंतु, तरुणांकडून उल्लंघन होत आहे.ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, ते पाहता कोरोनाच्या दुसºया लाटेला सुरुवात झाली, असे म्हणावे लागेल. या एकूणच परिस्थितीला नागरिकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे. राज्य सरकार असो अथवा स्थानिक प्रशासन त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, अनलॉकमध्ये घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नाही.- डॉ. प्रशांत पाटील, सचिव, कल्याण आयएमए

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस