शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 15:46 IST

कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरकै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते : डॉ. आनंद देशमुख

ठाणे : कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, एकदा चूक झाली की दुसºयांदा संधी मिळते पण दुसºयांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यावर खुप चांगले आयुष्य जगता येते. ज्या माणसाचे छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही.ही व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणुन उपस्थित होते. पुर्वी ठाणे हे व्याख्यानाचे शहर होते. आजच्या मुलांना इतिहास कालबाह्य झाला असे वाटते. हा समज ३० ते ३५ वर्षांपुर्वी उदयास आला आणि आता ही परिस्थीती सत्य असल्याचा त्यांना वाटत आहे. एकदा अवकाशात झेप घ्यायचे ठरवले की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करु नका ते गाठायचे ठरले तर निश्चित गाठा असे सांगत त्यांनी आपले अनुभव कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा तो ध्यास निर्माण झाला. १२ - १४ तास या विषयांचा अभ्यास करु लागलो. त्यानंतर इतिहासात एमए करायचे ठरविले. याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप देखील मिळाली. डॉक्टर, इंजिनिअर हीच क्षेत्र करिअर नाहीत. जर आवड असेल तर सामाजिक शास्त्रातील विषयाला तेवढीच गती मिळते. दुर्दैवाने पीएचडी करण्याची माझी इच्छा अपुर्ण राहीली परंतू ठाण्यात आल्यावर ही इच्छा पुर्ण करायला हरकत नाही. इतिहास व मराठी वाड्.मय हे विषय घेऊन जो प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी या पदावरुन जिल्हाधिकारी या पदावर येईपर्यंत ३० वर्षे लागली असे त्यांनी सांगितले. प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आनंद देशमुख म्हणाले की, इतिहास जगणारा शिक्षक विद्यार्थ्यांा इतिहास शिकवायला भेटला तर मुलांमध्ये या विषयाची आवड निर्माण होईल. पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते. इतिहास वेळोवेळी आंतरदृष्टी देते, नविन काहीतरी सुचवत असते. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रा. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर, विलास ठुसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आदीत्य दवणे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई