शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

दुर्गाडी पुलासाठी दुसरा कंत्राटदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:40 IST

कल्याण-भिवंडी मार्गावरील कल्याण खाडीवरील दुर्गाडी येथील सहापदरी पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे.

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावरील कल्याण खाडीवरील दुर्गाडी येथील सहापदरी पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले आहे. एमएमआरडीएने पुन्हा कंत्राटदार नेमण्यासाठी ६१ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे.दुर्गाडी येथील कल्याण खाडीवरील सध्याचा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे त्याला समांतर सहापदरी पूल बांधण्यास एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. जुलै २०१६ मध्ये पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता. ७३ कोटी रुपये खर्चाचा हा पूल १८ महिन्यांत बांधण्याची मुदत होती. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदार सुप्रीमो कंपनीने खाडीत दोन पोल उभारले. मात्र, त्याला मेरीटाइम बोर्डाने हरकत घेतली. त्यानुसार, नवा नकाशा तयार करून त्याचे वॉटर स्पॅन कसे असतील, याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, कंत्राटदाराने पुन्हा मंजुरी घेऊन कामाला सुरुवात केली. मात्र, कंत्राटदाराकडून अत्यंत संथगतीने काम सुरू होते. त्यामुळे जुलैमध्ये एमएमआरडीएच्या मुंबईतील कार्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुलाचे काम रखडले असल्याचे मान्य करत कंत्राटदार प्रत्यक्ष कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.परंतु, पुलाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. तसेच सुप्रीमो कंपनीचे कंत्राट रद्द करून नवा कंत्राटदार नेमण्याची मागणी केली होती.१ आॅक्टोबरनंतरही कंपनीने काम सुरू न केल्याने एमएमआरडीएने सुप्रीमोचे कंत्राट रद्द केले. आता पुलाच्या कामासाठी ६१ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा काढली आहे. निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राट कंपन्यांसोबत निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबरला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूक, त्याला कार्यादेश देण्यास २०१९ उजाडणार आहे. हे काम करण्यासाठी पुन्हा किमान १८ महिन्यांची मुदत दिली, तरी पूल २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे कल्याण-भिवंडी मार्गावरील नागरिक व वाहनचालकांची तोपर्यंत वाहतूककोंडीतून सुटका होणार नाही.