शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

दुर्गाडी पुलासाठी दुसरा कंत्राटदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:40 IST

कल्याण-भिवंडी मार्गावरील कल्याण खाडीवरील दुर्गाडी येथील सहापदरी पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे.

कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावरील कल्याण खाडीवरील दुर्गाडी येथील सहापदरी पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले आहे. एमएमआरडीएने पुन्हा कंत्राटदार नेमण्यासाठी ६१ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे.दुर्गाडी येथील कल्याण खाडीवरील सध्याचा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे त्याला समांतर सहापदरी पूल बांधण्यास एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. जुलै २०१६ मध्ये पुलाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला होता. ७३ कोटी रुपये खर्चाचा हा पूल १८ महिन्यांत बांधण्याची मुदत होती. पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदार सुप्रीमो कंपनीने खाडीत दोन पोल उभारले. मात्र, त्याला मेरीटाइम बोर्डाने हरकत घेतली. त्यानुसार, नवा नकाशा तयार करून त्याचे वॉटर स्पॅन कसे असतील, याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, कंत्राटदाराने पुन्हा मंजुरी घेऊन कामाला सुरुवात केली. मात्र, कंत्राटदाराकडून अत्यंत संथगतीने काम सुरू होते. त्यामुळे जुलैमध्ये एमएमआरडीएच्या मुंबईतील कार्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुलाचे काम रखडले असल्याचे मान्य करत कंत्राटदार प्रत्यक्ष कामाला १ आॅक्टोबरपासून सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.परंतु, पुलाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. तसेच सुप्रीमो कंपनीचे कंत्राट रद्द करून नवा कंत्राटदार नेमण्याची मागणी केली होती.१ आॅक्टोबरनंतरही कंपनीने काम सुरू न केल्याने एमएमआरडीएने सुप्रीमोचे कंत्राट रद्द केले. आता पुलाच्या कामासाठी ६१ कोटी ३३ लाख रुपयांची निविदा काढली आहे. निविदा भरण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राट कंपन्यांसोबत निविदापूर्व बैठक ७ डिसेंबरला होणार आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबरला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूक, त्याला कार्यादेश देण्यास २०१९ उजाडणार आहे. हे काम करण्यासाठी पुन्हा किमान १८ महिन्यांची मुदत दिली, तरी पूल २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे कल्याण-भिवंडी मार्गावरील नागरिक व वाहनचालकांची तोपर्यंत वाहतूककोंडीतून सुटका होणार नाही.