शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
3
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
4
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
5
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
6
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
7
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
8
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
9
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
11
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
12
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
13
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
14
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
15
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
16
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
17
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
18
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
19
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
20
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...

३२ ऐवजी १४ प्रवाशांसाठीच आसनव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:41 AM

मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच काही उपनगरीय लोकल डब्यांमधील आसनव्यवस्था बदलली. मात्र, यामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा या लांबच्या अंतरावरून

डोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच काही उपनगरीय लोकल डब्यांमधील आसनव्यवस्था बदलली. मात्र, यामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा या लांबच्या अंतरावरून येणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्याने आता डब्यात केवळ १४ च प्रवासी बसू शकतात.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीपासूनच ठाणे - कल्याण पुढे आपल्या इच्छित स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी उभे राहूनच प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये अभावानेच प्रवासी घाटकोपर, ठाणे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असा ताटकळत प्रवास करावा लागत असेल, तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा असेही ते म्हणाले.ज्या लोकलची आसनव्यवस्था कमी केली आहे, त्या सर्व उपनगरीय लोकल या केवळ कमी अंतरावरील प्रवासासाठीच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कुर्ला - ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत असा प्रवास करणे त्रासाचे आहे.